Prithviraj Chavan on sangli loksabha election seat Esakal
लोकसभा २०२४

Prithviraj Chavan: २०१९ ला नाईलाजास्तव आघाडी केली पण.. पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं सांगलीची सीट सोडण्यामागचे कारण

Sangali Loksabha Election: सांगलीचा उमेदवार ठरवताना एक मिनिटही लागणार नाही असे वाटायचे. परंतू यामध्ये बरेच राजकारण झाले.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत काँग्रेसमधून बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा सुरू आहे.

यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, युती-आघाडी करुन निवडणूक लढवताना मित्र पक्षांमध्ये संघर्ष होत असतात. पण सांगलीच्या जागेवरुन झालेला संघर्ष हा पण सांगलीच्या जागेवरून झालेला संघर्ष हा न भूतो ना भविष्यती असा होता, असे सांगत कार्यकर्त्यांसमोर अनेक गोष्टी उघडल्या.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले 2019 मध्ये आपल्याला नाईलाजस्तव तीन पक्षांची आघाडी करावी लागली. जर 2019 ला वेगळा निकाल लागला असता तर कशाला आघाडी केली असती. पण नाईलाजस्तव केलेल्या आघाडीची किंमत सांगलीच्या रुपाने मोजावी लागत आहे. पण काहीही असले तरी या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा आणि देशात इंडिया आघाडीचा विजय झाला पाहिजे अन्यथा पुढील पिड्यांचा शाप आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे आपल्याला एकत्र काम करत महाविकास आघाडीला विजयी करावे लागेल.

यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सांगली हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस बालेकिल्ला आहे. त्यामुळे सांगलीचा उमेदवार ठरवताना एक मिनिटही लागणार नाही असे वाटायचे. परंतू यामध्ये बरेच राजकारण झाले. मागच्या वेळीही असेच काहीतरी राजकारण झाले आणि काँग्रेसच्या हातातून ही सीट गेली. पण यंदा असे काही होणार नाही याची खात्री होती. पण सध्या आपण तीन पक्षांच्या आघाडीमध्ये असल्याने काही प्रश्न निर्माण झाले आणि पुन्हा ही जागा आपल्या हातून निसटली.

2019 मध्ये एका विशिष्ठ परिस्थितीत भाजपच्या हाती पुन्हा 5 वर्षे सत्ता जाऊ नये ही निवडणून आलेल्या आमदारांची भावना होती. त्यामुळे आपल्याला तीन पक्षांची महाविकास आघाडी करावी लागणी आणि सरकार स्थापन झाले. आपला तिसरा नंबर होता, त्यामुळे संख्येप्रमाणे वाटा मिळाला. ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार चांगले चालले. पण पुढे काही राजकारण झाले. शिवसेना फोडण्यात आली. आणि याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT