Kolhapur Lok Sabha Election esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Loksabha : '..म्हणून कोल्हापुरात मान गादीला आणि मत मोदींना असं चालत नाही’; सतेज पाटलांचा थेट निशाणा

‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो.

सकाळ डिजिटल टीम

‘सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी, ही आमची इच्छा होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कोणताही विषय नव्हता.'

कोल्हापूर : ‘उमेदवारी जाहीर होत नाही यावरून महायुतीत किती भांडणे आहेत ते कळते. कोल्हापूरची माती वेगळी आहे, धर्मही वेगळा आहे. त्यामुळे कोल्हापुरात कोणतीही हवा चालत नाही, म्हणून मान गादीला आणि मत मोदींना असे कोल्हापुरात होणार नाही’, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार संसदेत जाणार आहे. या सगळ्यांचा आम्हाला आणि कोल्हापूरकरांना आनंद आहे. आज विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर २५ वर्षांनी काँग्रेस चिन्हासमोरचे बटन दाबायला मिळणार आहे.

‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले. ॲड. आंबेडकर यांचा राज्यातील निर्णय झालेला नाही. त्यांनी आमच्या सोबत यावे, अशी इच्छा आहे.’

राजू शेट्टी यांच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले, ‘शेट्टी यांच्याबाबत पुढच्या दोन दिवसांत निर्णय होईल. हातकणंगलेची जागा ही शिवसेनेची आहे; पण आम्हाला वाटते की, शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे. महायुतीच्या खासदाराला पराभूत करणे हा महाविकास आघाडीचा अजेंडा असेल. आमच्या विचाराचा खासदार दिल्लीत जावा, अशी आमची भूमिका आहे.’

‘आज खासदार उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जाऊन तीन दिवस भेट मिळत नाही. त्यामुळे उदयनराजे यांच्याबद्दल कुणाला आदर आहे, हे समोर आले आहे. उदयनराजे यांची गरज होती, त्यावेळी घरात येऊन सन्मान केला होता. मग आता भाजपला उदयनराजे यांची गरज आहे की, नाही मला माहीत नाही,’ असे पाटील यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. ‘अण्णा हजारे हे सगळ्याच विषयांत बोलले तर त्यांची भूमिका सार्थक ठरेल. गेले कित्येक वर्षे अण्णा हजारे सरकारच्या विरोधात बोललेले नाहीत’, असेही ते म्हणाले.

सांगलीवर हक्क काँग्रेसचाच

‘सांगली पारंपरिक पद्धतीने आम्हाला मिळावी, ही आमची इच्छा होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कोणताही विषय नव्हता. सांगलीत विशाल पाटील उभे राहिले तर ते निवडून येतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराची घोषणा करणे हा त्यांचा निर्णय आहे; पण अजून आम्हाला याबाबत सकारात्मक काही घडेल असे वाटते’, असे सतेज पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT