Finance Minister Dr. C. D. Deshmukh esakal
लोकसभा २०२४

Finance Minister : मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी राजीनामा देणारे अर्थमंत्री; थेट पंतप्रधानांना सुनावलं अन्..

शेकडो जणांनी आपलं रक्त सांडलं, जनतेच्या एकजुटीने मग्रूर सत्तेला धडा शिकवला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ च्या सुरुवातीस मुंबई केंद्रशासित करण्याचा इरादा स्पष्ट केला होता.

-सतीश पाटणकर

१ मे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). लाखो जणांनी आंदोलने केली, शेकडो जणांनी आपलं रक्त सांडलं, जनतेच्या एकजुटीने मग्रूर सत्तेला धडा शिकवला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. जनतेचं आंदोलन सुरू होतं. मात्र, काही मराठी पुढारी होते जे आपली खुर्ची वाचवण्याच्या मागे लागले होते व चळवळीला विरोध करत राहिले. मात्र, एक नेता असा होता ज्याने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, मराठी माणसावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून थेट पंतप्रधानांना सुनावलं, देशाच्या अर्थमंत्रिपदाचा (Finance Minister) सहज राजीनामा देऊन टाकला. ते होते आधुनिक रामशास्त्री म्हणून ज्यांना ओळखलं गेलं असे डॉ. सी. डी. देशमुख.

भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. सी. डी. देशमुख (Dr. C. D. Deshmukh) हे एक सनदी अधिकारी होते. ते १९३९ ला भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. १ जानेवारी १९४९ ला रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. १९५० ते १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५६च्या सुरुवातीस मुंबई केंद्रशासित करण्याचा इरादा स्पष्ट केला होता.

जवाहरलाल नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) वक्तव्याने आंदोलक अधिकच भडकले. या सर्व घटनांचे साक्षीदार बुद्धिवान अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख होते. या घटनेनंतर त्यांचा स्वाभिमान, मराठी बाणा जागवला आणि केंद्रीय अर्थमंत्रिपदाच्या राजीनाम्याचा विचार देशमुख यांच्या डोक्यात घोळू लागला. २५ जुलै १९५६ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा न करता पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याचा महाराष्ट्रविरोधी निर्णय घेतला.

सी. डी. देशमुख यांच्या अस्वस्थतेचा स्फोट झाला आणि त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लोकसभेत केलेल्या घणाघाती भाषणात नेहरूंचा हुकूमशहा अशा शब्दांत उल्लेख केला. देशमुख यांनी अर्धा तास केलेल्या भाषणाने सारा देश हादरून गेला. महाराष्ट्रतील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले.

(लेखक मुख्यमंत्र्याचें माजी माहिती अधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Election: शिंदेसेनेने डोंबिवलीत खाते उघडले! कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा तिहेरी बिनविरोध विजय

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT