Loksabha 2019

Loksabha 2019 : दहशतवाद्यांच्या मृत्यूचे महाआघाडीतील नेत्यांना दु:ख : अमित शहा

पीटीआय

मुंगेर : बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर दोन ठिकाणी शोक पाळण्यात आला. एक पाकिस्तानात, तेथे शोक होणारच, दुसरे म्हणजे राहुल बाबा अँड कंपनींच्या महाआघाडींत, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. दहशतवाद्यांना मारल्याबद्दल या नेत्यांना दु:ख झाले, असे शहा म्हणाले. बिहारच्या मुंगेर येथे आयोजित प्रचारसभेत अमित शहा यांनी राजदवर जोरदार हल्लाबोल केला.

जेडीयूचे उमेदवार ललनसिंह यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना शहा म्हणाले, एनडीए सरकारने बिहारला गुंडागर्दी, भ्रष्टाचार, लूटमारीवर आधारलेल्या राजदच्या जंगलराजमधून बाहेर काढले आणि पुढील पाच वर्ष बिहारला संपूर्णपणे विकसित राज्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. बालाकोटच्या कारवाईनंतर कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर शहा यांनी टीका केली.

ते म्हणाले, तिकडे पाकिस्तानात दहशतवादी मारले गेले आणि इकडे नेतेमंडळीचे चेहरे पडले. ते काय तुमचे नातलग होते का? बिहारची जनता गुंडाराज, भ्रष्टाचार, लूटमारमध्ये अडकली होती आणि राजद सरकारमुळे राज्य विकासापासून वंचित राहिले होते. आपल्याला जंगलराज आठवते का? पण नीतीशकुमार आणि सुशील मोदी यांचे सरकार आल्यानंतर बिहारच्या जनतेने मोकळेपणाचा श्‍वास घेतला. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे आणि विकास करण्याचे काम एनडीएने केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT