Loksabha 2019

Loksabha 2019 : 'फिर एक बार मोदी सरकार' ही तर जनतेचीच घोषणा : अमित शहा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मोदी सरकार पुन्हा येण्याबाबतची घोषणा देशातील जनतेने केली आहे. त्यांच्याकडून 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा दिला गेला. त्यानंतर 'बार-बार मोदी सरकार' असे प्रत्युत्तर मिळत होते, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) सांगितले. 

नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमित शहा बोलत होते. यावेळी शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेद्र मोदी उपस्थित होते. अमित शहा म्हणाले, सर्वांत जास्त मेहनत असणारी निवडणूक अभियान यंदा पार पडले. भाजप संघटनात्मक आधारावर काम करत आहे. 2014 मध्ये झालेला ऐतिहासिक विजय जनतेमुळे होऊ शकला. पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले. या पाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी 133 योजना आणल्या. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब, जनतेसाठी प्रयत्न केले. या योजनेचे देशात मोठे योगदान आहे. या निवडणूक कार्यक्रमात 142 सभा, 4 रोड शो घेण्यात आले होत. एक कोटी 50 लाख लोकांसोबत मोदींनी थेट संपर्क साधला, असेही ते म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही

2014 मध्ये 6 राज्यांत आमचे सरकार होते. मात्र, आता 16 राज्यांत आमचे सरकार आहे. विरोधकांकडून भ्रष्टाचार आणि महागाईचा मुद्दा या निवडणुकीत उचलण्यात आला नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT