Loksabha 2019

Loksabha 2019 : प्रचारबंदी संपताच मायावतींची निवडणूक आयोगावरच टीका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचारबंदीची केली होती. त्यांच्यावरील कारवाई संपल्यानंतर मायावतींनी आता थेट निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रचारबंदीचे उल्लघंन केले जात आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल मायावती यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. मायावती यांनी ट्विटरवरुन निवडणूक आयोगावर टीका केली.

मायावती यांनी ट्विटरवरून सांगितले, की ''योगी आदित्यनाथ यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या प्रचारबंदीचे उल्लंघन केले जात आहे. आदित्यनाथ मंदिर, शहर आणि दलितांच्या घराबाहेर जाऊन जेवण करण्याचे नाटक करत आहेत. या गोष्टींचे प्रसारण मीडियामध्ये करुन निवडणुकीत लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे केले जात असताना निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई का करत नाही'', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, भाजप नेत्यांबाबत निवडणूक आयोगाकडून दुर्लक्ष केले जात असेल तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होण्याची शक्यता कठिण आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT