Loksabha 2019

Loksabha 2019 : देशातील गरिबीला काँग्रेस जबाबदार : गडकरी

पीटीआय

बेतुल (मध्य प्रदेश) : "देशातील गरिबीला कॉंग्रेस जबाबदार आहे. कृषी क्षेत्र आणि गावांच्या विकासासाठी पूर्वी कोणतेही ठोस धोरण आखले नाही,'' असा दावा केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केला. 

बेतुल लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दुर्गादास ऊईके यांच्यासाठी गडकरी यांची प्रचारसभा मुलताई येथे झाली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही गरिबी हटविणे शक्‍य झाले नाही असा दावा करीत, मग सध्याचे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना गरिबी नष्ट करणे कसे शक्‍य होणार आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला.

"कॉंग्रेसमुळेच आपल्या देशात दारिद्य्र आहे. आपला देश संपन्न आहे; पण देशातील लोक गरीब आहेत. याचे कारण म्हणजे शेती आणि गावांच्या विकासासाठी कोणतीही योजना गंभीरपणे राबविली नाही. यामुळेच गहू स्वस्तात उपलब्ध होतो, तर बिस्कीट महाग असते. फळे स्वस्त असतात; पण त्यांचा रस महाग मिळतो,'' अशी टीका गडकरी यांनी केली. 

ते म्हणाले, की कॉंग्रेसच्या राजवटीत गरीब हा अधिक गरीब बनला. त्याच वेळी पक्षाच्या खुशमस्कऱ्यांनी स्वतःची गरिबीतून सुटका करून घेतली. जातीयवाद, धर्मवाद आणि दहशतीच्या राजकारणाचा वापर कॉंग्रेसने केला. मात्र भाजपला हे सर्व संपवायचे आहे. बेतुलमधून कॉंग्रेसकडून रामू टीकम हे रिंगणात उतरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT