Loksabha 2019

Loksabha 2019 : 'मोदींमुळे देश झाला उद्ध्वस्त'

वृत्तसंस्था

पटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोज 20 तास काम करत आहेत. त्यामुळे देश उद्ध्वस्त झाला आहे, अशा शब्दांत बिहारमधील बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. कन्हैयाकुमार यांनी ही टीका ट्विटरवरून केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि भाजपवर विरोधकांकडून विविध मुद्यांवर टीका केली जात आहे. असे असताना आता कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खात्याचीही परिस्थिती बिकट झाली आहे. टपाल खात्याला 15 हजार कोटींचा तोटा झाला आहे. देश उगच नाही उद्ध्वस्त होत आहे. 'चौकीदार'साहेब यासाठी रोज 20 तास काम करत आहेत. तेही कोणतीही सुट्टी न घेता''.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच समोर भारतीय टपाल खाते मोठ्या आर्थिक संकटात असून, तोटा सहन करावा लागत आहे. या कंपनीच्या तोट्याची आकडेवारी ही बीएसएनएल आणि एअर इंडियाच्या तोट्याच्या आकड्याहून अधिक आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT