shivneri 
Loksabha 2019

कारणराजकारण : किल्ले शिवनेरीकडे सरकारचे दुर्लक्ष : जुन्नरवासी (व्हिडिओ)

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीचा विकास अद्याप झालेला नाही. तो होणे अत्यंत गरजचे आहे. त्याचबरोबर जुन्नर शहराचा देखील विकास होण्याची गरज असल्याचे जुन्नर येथील स्थानिक नागरिकांनी केली. तसेच बाहेरुन येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास स्थान, पार्किंग सुविधा, शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा, आणि गडावर जाण्यासाठी 'रोप वे' निर्माण, या गोष्टी येथे होण्याची गरज असल्याचे या नागरिकांनी सांगितले. 

राज्य आणि राज्याबाहेरुन येणाऱ्या शिवभक्तांची संख्या खुप मोठी आहे. मात्र, सत्तेत कोणताही पक्ष असला तरी गडाचा आणि परिसराचा विकास झाला नसल्याची खंत जुन्नरच्या नागरिकांनी व्यक्त केली. कारणराजकारण या 'सकाळ'च्या उपक्रमामध्ये येथील सुनिल ढोबळे, सचिन गीरी, अंबर परदेशी या नागरिकांनी सहभाग घेतला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ'च्या टिमने शिवनेरी किल्ला आणि जुन्नर शहराच्या विकासाबाबत नागरिकाशी चर्चा केली. यावेळी सुनिल ढोबळे म्हणाले, "जुन्नर शहराला फार जुना इतिहास असून शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळामुळे जुन्नर जगभर परिचित झाले. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे शिवनेरी आणि जुन्नरचा विकास झाला नाही." पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात करण्यात आल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सकाळ ची टिम जुन्नर मध्ये पोचली तेव्हा किल्ले शिवनेरीच्या जंगल परिसरामध्ये वनवा लागलेला होता. त्यामुळे किल्ल्याच्या परिसरातील काही भाग जळून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT