Loksabha 2019

Loksabha 2019 : मनमोहनसिंग काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' होते. त्यांना देशाची नाहीतर खुर्चीची चिंता जास्त होती. या चिंतेमुळेच देश बरबाद होत गेला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर आज (रविवार) टीकास्त्र सोडले. 

मध्यप्रदेशातील सागर येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, 2004 मध्ये काँग्रेसला सत्तेची संधी मिळाली होती. तेव्हा काँग्रेसला वाटलेही नव्हते की आपल्याला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल. त्यादरम्यान सत्ता सांभाळण्याची तयारी 'राजकुमार'ची नव्हती. इतकेच नाहीतर काँग्रेसलाही त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. त्यामुळे गांधी परिवाराने त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या 'वॉचमन'ला (मनमोहनसिंग) सत्तेवर बसविण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, 'राजकुमार'ला सर्व गोष्टी लवकर याव्यात, यासाठी सर्वच वाट पाहत होते. त्यांना त्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र, हे सर्वकाही पाण्यात गेले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT