Loksabha 2019

Loksabha 2019 : मनमोहनसिंग काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' : पंतप्रधान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' होते. त्यांना देशाची नाहीतर खुर्चीची चिंता जास्त होती. या चिंतेमुळेच देश बरबाद होत गेला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर आज (रविवार) टीकास्त्र सोडले. 

मध्यप्रदेशातील सागर येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, 2004 मध्ये काँग्रेसला सत्तेची संधी मिळाली होती. तेव्हा काँग्रेसला वाटलेही नव्हते की आपल्याला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळेल. त्यादरम्यान सत्ता सांभाळण्याची तयारी 'राजकुमार'ची नव्हती. इतकेच नाहीतर काँग्रेसलाही त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. त्यामुळे गांधी परिवाराने त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या 'वॉचमन'ला (मनमोहनसिंग) सत्तेवर बसविण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, 'राजकुमार'ला सर्व गोष्टी लवकर याव्यात, यासाठी सर्वच वाट पाहत होते. त्यांना त्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र, हे सर्वकाही पाण्यात गेले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT