modi 
Loksabha 2019

Loksabha 2019 : मोदी म्हणतात, 'अजून मी जिंकलेलो नाही; कृपया मतदान करा!'

वृत्तसंस्था

वाराणसी : 'आता नरेंद्र मोदी जिंकून आलेच आहेत आणि त्यामुळे आता मतदान केले नाही, तरीही चालू शकेल, अशी वातावरणनिर्मिती काहीजण करू लागले आहेत. कृपया असलं काहीही करू नका', असे मिश्‍किल आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) केले. मोदी यांनी आज शक्तिप्रदर्शन करत वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. 

अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'आता मोदी जिंकलेच असे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे आता मतदान केले नाही, तरीही चालू शकेल असेही सांगितले जात आहे. कृपया असे काहीही करू नका. मतदान करणे हा तुमचा अधिकार आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सवा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करायला हवे. देश मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे.'' 

अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदी यांनी वाराणसीमध्ये जोरदार 'रोड शो' केला. याविषयीही त्यांनी भाष्य केले. 'वाराणसीतील मतदारांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता पाच वर्षांनंतर पुन्हा त्यांनी असेच आशीर्वाद मला दिले आहेत', असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

SCROLL FOR NEXT