Loksabha 2019

Loksabha 2019 : शेरोशायरी करत मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र 

पी. बी. सिंह

प्रतापगड (उत्तर प्रदेश) : "न मैं गिरा और न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे,' अशी शेरोशायरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. मात्र बसप आणि या पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर त्यांनी सौम्य शब्दांत टीका केली. 

प्रतापगडमध्ये झालेल्या सभेत बोलताना मोदींनी, देशाला भ्रष्टाचार, अस्थिरता, जातियवाद, घराणेशाही आणि कुशासन या पाच बाबींपासून धोका असल्याचे प्रतिपादन केले. लोकसभेसाठी आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यांत उत्तर प्रदेशातील मतदारांनी निकाल काय येतील याचा निर्णय केला आहे असे सांगून मोदी म्हणाले, की पाचव्या टप्प्यातही मतादारांनी असाच उत्साह दाखविला, तर महामिलावटी लोकांना मैदान सोडावे लागेल. सप-बसप आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, की आघाडीच्या नावाखाली सपने मायावतींच्या पक्षाकडून फायदा करून घेतला. मात्र सप-कॉंग्रेसने काय खेळी केली आहे याची मायावतींना जाणीव झाली असून, त्या आता कॉंग्रेसवर उघड टीका करत आहेत. 

कॉंग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, ""माझी प्रतिमा मलिन करणे हे कॉंग्रेसचे एकमेव लक्ष्य आहे. पण मी सोन्याचा चमचा घेऊन आणि मोठ्या घराण्यात जन्मलेलो नाही. भारत मातेच्या मातीत मी वाढलो आहे. गेली पन्नास वर्षे मी फक्त देशासाठी जगतो आहे. कॉंग्रेसचे नामदार ट्रस्टच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतात. काराखान्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तेथे नोटांची शेती करतात.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT