Rahul Gandhi Abhijit Pawar
Rahul Gandhi Abhijit Pawar 
Loksabha 2019

RahulWithSakal : बेरोजगारी हा देशासमोरचा सर्वात मोठा प्रश्न : राहुल गांधी

सकाळवृत्तसेवा

प्रश्‍न : रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांसारख्या मुद्द्यांचे काय?

उत्तर : हे पाहा. सध्या भारताला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. रोजगाराचे संकट, शेतीतील संकट आणि अर्थव्यवस्थेपुढील संकट. हे तीनही प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत. आपल्या व्यवस्थेकडे समग्र दृष्टीने पाहिले पाहिजे. स्टार्टअपसाठी धोरण आखले आणि त्यात शेतीचा समावेश केलाच नाही, तर ते अयोग्य होईल. तुम्ही रोजगार निर्माण कसे करणार? तो शेतीतूनच निर्माण होईल. बांधकाम क्षेत्रातून तयार होईल. त्यामुळेच या सगळ्यांचा समग्र विचार आवश्‍यक आहे. मोदी हे लक्षात घेत नाहीत आणि हीच त्यांची समस्या आहे.  

ते तुकड्या-तुकड्याने या सगळ्यांचा विचार करतात. ते आधी एका गोष्टीवर भर देतात, मग दुसरी गोष्ट विचारात घेतात, त्यानंतर तिसऱ्या गोष्टीकडे वळतात. ही पद्धतच फार चुकीची आहे. नोटाबंदी हे याचे उदाहरण.

माझ्या मते भारतासमोरचे महत्त्वाचे प्रश्‍न म्हणजे शेतीचा प्रश्‍न, अर्थव्यवस्थेचा प्रश्‍न आणि बेरोजगारी. आणि राष्ट्रवादी असणाऱ्या प्रत्येकाने हे प्रश्‍न सोडवण्यासाठी त्याच्याकडून होतील ते प्रयत्न करायला हवेत आणि ते (मोदी) जर हे करू शकत नसतील, तर त्यांना अपयश का आले, हे त्यांनी संपूर्ण देशाला सांगायला हवे. भारत जर तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नसेल, आज देशात रोज २७ हजार नोकऱ्या जात आहेत, आणि चीन रोज ५० हजार नोकऱ्या नव्याने निर्माण करत आहे. भारत हा प्रश्‍न सोडवू शकला नाही, तर भारतासमोर एक मोठे संकट उभे राहील. राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्तींसमोर आज रोजगारनिर्मिती एवढे दुसरे कोणतेही महत्त्वाचे काम नाही. इथे मोदी पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत, अत्यंत वाईट, अपमानास्पद रीतीने अयशस्वी ठरले आहेत. अशा स्थितीत त्यांना राष्ट्रवादी म्हणता येणार नाही.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT