Loksabha 2019

Loksabha 2019 : 'प्रादेशिक पक्षांची आघाडी केंद्रात सत्तेवर येईल'

पीटीआय

कोलकता : लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात प्रादेशिक पक्षांची आघाडी केंद्रात सत्तेवर येणार असून, त्यात आम्ही "सर्वांत महत्त्वाची' भूमिका बजावू, असा दावा तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला. "फॅसिस्ट' नरेंद्र मोदी सरकार सत्तेवरून जाईल, असे ते म्हणाले.

केंद्रात भाजपेतर सरकार सत्तेवर आल्यास पंतप्रधानपदासाठी "तृणमूल'च्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी दावेदार असतील की नाही, या प्रश्‍नावर ओब्रायन यांनी मौन बाळगले. निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर मोदी सरकार जाणार आणि प्रादेशिक पक्षांच्या आघाडीचे सरकार येणार, हे मी खात्रीपूर्वक सांगतो, असे त्यांनी सांगितले. आघाडीचा नेता कोण असणार, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""सर्व नेते आणि खासदार एकत्र बसून त्यांचा नेता कोण असावा, हे ठरवतील.

आघाडीचा नेता निवडण्यासाठी आम्हाला एक तास पुरेसा आहे. नव्या सरकारच्या स्थापनेत तृणमूल कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल.'' पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ममता बॅनर्जी असतील की नाही, या प्रश्‍नाचे उत्तर न देता, "ममता बॅनर्जी खासदार होत्या. अनेकदा केंद्रीय मंत्री होत्या आणि दोनदा मुख्यमंत्री आहेत. त्यांचे कामच सगळे सांगेल,' असे ओब्रायन म्हणाले. 

पश्‍चिम बंगालमध्ये सर्व 42 जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून ते म्हणाले, की तसे झाल्यास आम्हाला कोणाकडे जावे लागणार नाही. भाजपेतर आघाडीत कॉंग्रेसलाही स्थान असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT