121 new COVID19 positive cases reported in the Maharashtra today 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : महाराष्ट्राचा आकडा २४५५वर; आज कोठे किती वाढले रुग्ण?

वृत्तसंस्था

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आज (ता. १४) दुपारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२१ने वाढला आहे. महाराष्ट्रात आज १२१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने १२१ रुग्ण आढळल्याने आता महाराष्ट्रात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २४५५ इतकी झाली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २३३४ होती. त्यामध्ये १२१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २४५५ झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंते भर घालणारीच ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

कोठे किती वाढले रुग्ण?

  • मुंबई : ९२
  • नवी मुंबई : १३
  • रायगड : ०१
  • ठाणे महानगरपालिका आणि मंडळ : १०
  • वसई विरार : ०५
  • एकूण : १२१

दरम्यान, महाराष्ट्रात करोनाची लागण झाल्याने २४५५ बाधित आहेत. तर १५५ पेक्षा जास्त रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवला गेला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारीच केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाउन हा ३ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ३ मे पर्यंत लॉकडाउन असणारच आहे हे उघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT