Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

उजनी धरणाची वाटचाल सध्या १०० टक्क्यांकडे सुरू आहे. धरणात दौंडवरून १७ हजारांहून अधिक क्युसेकची आवक असून शनिवारी धरण ८३ टक्के होईल. धरणातील साठा आणि दौंडवरून येणारा विसर्ग पाहता आषाढी वारीचा सोहळा पार पडल्यावर रविवारी (ता. ६) रात्री उजनीचे १६ दरवाजे २० सेंटीमीटरने उघडले जाणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणाची वाटचाल सध्या १०० टक्क्यांकडे सुरू आहे. धरणात दौंडवरून १७ हजारांहून अधिक क्युसेकची आवक असून उद्या (शनिवारी) धरण ८३ टक्के होईल. धरणातील साठा आणि दौंडवरून येणारा विसर्ग पाहता आषाढी वारीचा सोहळा पार पडल्यावर रविवारी (ता. ६) रात्री उजनीचे १६ दरवाजे २० सेंटीमीटरने उघडले जाणार आहेत. सुरवातीला १० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडला जाणार आहे.

उजनी धरणाची एकूण साठवण क्षमता ११९ टीएमसी असून सध्या धरणात १०५ टीएमसी पाणी आहे. दरवर्षी जूनअखेर धरण उणे पातळीत राहिल्याने जुलैमध्ये धरण १० ते २० टक्केच भरलेले असायचे. मात्र, यंदा मे महिन्यातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने मेअखेर धरणाने ५० टक्क्यांची पातळी ओलांडली होती. जूनमध्ये सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली, तरीदेखील पुणे जिल्ह्यातील पावसामुळे दौंडवरून येणाऱ्या विसर्गातून उजनी धरण सध्या ७७ टक्क्यांवर पोचले आहे. दुसरीकडे जूनमध्ये धरणात अपेक्षेपेक्षा जास्त येणारे पाणी भीमा नदीतून सोडून देण्यात आले. आता आषाढी वारीमुळे भीमा नदीत सोडलेला उजनीचा विसर्ग पूर्णत: थांबविल्याने धरणातील साठा सोमवारी (ता. ८) ९० टक्क्यांवर पोचणार आहे. परंतु, जुलैमध्ये धरणात ८५ टक्केच पाणी राखून ठेवणे अपेक्षित असल्याने उर्वरित सर्व पाणी भीमा नदीतून सोडणे सुरूच राहील, असे उजनी धरण व्यवस्थापनाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • १०५.१८ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ७७.४५ टक्के

  • दौंडवरून पाण्याची आवक

  • १७,३०० क्युसेक

  • बोगदा, ‘सिंचन’द्वारे सोडलेले पाणी

  • १०८० क्युसेक

कॅनॉलचे पाणी थेट नदीत

उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग आषाढी वारीमुळे रविवारपर्यंत (ता. ६) थांबविण्यात आला आहे. पण, कॅनॉल, बोगदा व सीना-माढा आणि दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून २७८० क्युसेक पाणी सोडले जात आहे. कालव्यातून १७०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे, पण पाऊस चांगला झाल्याने शेतकरी ते पाणी घेत नाहीत. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी थेट नदीला मिळत असल्याचे चित्र आहे. कॅनॉलमधून सोडलेला विसर्ग शुक्रवारी सायंकाळी १५०० वरून १७०० क्युसेक करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT