schools
schools sakal
महाराष्ट्र

समाजशास्त्र विषयाचे २८६ शिक्षक अतिरिक्त! ‘नकार’ कळविलेल्या २११ जणांचे १५ जूनपूर्वी होणार समायोजन

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद शाळांमधील समाजशास्त्र विषयाचे तब्बल २८६ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यांच्या समायोजनाचा तिढा प्रशासनाला अजूनही सोडविता आलेला नाही. आता शासनाच्या मार्गदर्शनानंतर त्यासंबंधीचे शासन निर्णय व परिपत्रकाचा अभ्यास करून त्या शिक्षकांचे शाळा सुरु होण्यापूर्वी समायोजन केले जाणार आहे.

मागील शैक्षणिक वर्षाची संचमान्यता होण्यापूर्वीच सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अतिरिक्तचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांना उपशिक्षकपदी पदावनत केल्यानंतर राहिलेल्या रिक्त जागा संचमान्यतेनंतर भरल्या जाणार आहेत. त्यात पुन्हा १८ ते २० हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले असून अनेकांकडे आधारकार्डच नसल्याची वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे नेमक्या किती जागा रिक्त राहतील की आहेत त्यातीलच अतिरिक्त होतील हा प्रश्न प्रशासनाला भेडसावू लागला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोरोना काळातील पारावरील शाळा, गृहभेटी अशा उपक्रमांमुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दहा हजारांपर्यंत वाढली. आता पुन्हा एकदा पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील, अन्यथा अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सर्वांना सोबत घेऊन गुणवत्ता वाढीचा प्रयत्न

समाजशास्त्र विषयाच्या अतिरिक्त शिक्षकांनी यापूर्वीच ‘नकार’ कळविला आहे. त्यांचे समायोजन करण्यापूर्वी शासनाकडून मार्गदर्शन घेतले आहे. यापूर्वीचे शासन निर्णय व प्रचलित कार्यपद्धती, याचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढला जात आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांना सोबत घेऊन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातील.

- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

लोहारांनी केले अन्‌ आता आले अंगलट

तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी विज्ञान विषयाच्या तब्बल साडेपाचशे ते सहाशे शिक्षकांना वेगवेगळ्या शाळांवर नेमणुका दिल्या. त्यामुळे समाजशास्त्राचे २८६ शिक्षक अतिरिक्त झाले. गरजेपेक्षा समाजशास्त्राचे शिक्षक अधिक झाल्याने अतिरिक्तचा प्रश्न उद्‌भवला. त्यांना विषय शिक्षक म्हणून नेमणूकच देता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तरीपण, ज्यांनी उपशिक्षक होण्याची तयारी दर्शवत ‘नकार’ कळविला आहे, त्यांना आता नेमणुका दिल्या जाणार असून तशी तयारी प्रशासनाने केली आहे.

६०४ मधून १५२ शिक्षक होणार मुख्याध्यापक

जिल्हा परिषदेच्या १५२ शाळांना मागील एक-दीड वर्षांपासून प्रभारी मुख्याध्यापकच होते. आता त्या शाळांना सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना मुख्याध्यापक मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या ८९३ शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. पण, त्यातील २८९ शिक्षकांनी २०२१ मध्ये पदोन्नतीसाठी नकार दिला होता. त्यामुळे त्यांना तीन वर्षे त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ६०४ शिक्षकांचे समुपदेशन करून त्यापैकी १५२ जणांना पदोन्नतीची संधी मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत ही कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT