solapur-pune highway sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! सोलापूर-पुणे महामार्गावर नवे ३ उड्डाणपूल; अर्जुनसोंड, अनगरजवळील पुलाचे काम सुरू; सावळेश्वरजवळील उड्डाणपुलाचाही प्रस्ताव; दररोज ४०००० वाहनांची वर्दळ

रस्ते अपघात रोखण्यासाठी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुनसोंड व अनगर पाटी या ठिकाणी उड्डाणपूल व सर्व्हिस रोड तयार केला जात आहे. दुसरीकडे सावळेश्वर पाटीजवळही उड्डाणपूल प्रस्तावित असून त्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर याचेही काम काही दिवसांत सुरू होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : रस्ते अपघात रोखण्यासाठी सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुनसोंड व अनगर पाटी या दोन ठिकाणी उड्डाणपूल व सर्व्हिस रोड तयार केला जात आहे. दुसरीकडे सावळेश्वर पाटीजवळ देखील उड्डाणपूल प्रस्तावित असून त्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर याचेही काम काही दिवसांत सुरू होणार आहे. सध्या अर्जुनसोंड व अनगरजवळील उड्डाणपूलासाठी ६४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एका वर्षात उड्डाणपुलांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

सोलापूर जिल्ह्यात दररोज सरासरी दोन जणांचा अपघाती मृत्यू होतोय. दरवर्षी रस्ते अपघाताबरोबरच अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणी विशेषतः ज्या गावकऱ्यांना शेती किंवा घराकडे ये-जा करण्यासाठी विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो अशा ठिकाणी नव्याने उड्डाणपूल तयार केले जात आहेत. मोहोळ शहरातील इंदिरा कन्या प्रशालेजवळ सतत अपघात होत होते. त्याठिकाणी आता उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे.

आता अर्जुनसोंडजवळ काम सुरू असून लांबोटी (चंदनगर) पुलापासून काही अंतरापर्यंत हा उड्डाणपूल असणार आहे. त्यासाठी साधारणत: १९ कोटी रुपयांचा खर्च होणार असून एक वर्षात याचे काम पूर्ण केले जाणार आहे. दुसरीकडे अनगर पाटीजवळील उड्डाणपुलासाठी ४५ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याचेही काम डिसेंबर २०२५ पूर्वी पूर्ण होणार आहे. सावळेश्वरजवळील उड्डाणपुलासाठी ३० कोटींचा खर्च अपेक्षित असून मंजुरीसाठी त्याचा प्रस्ताव प्राधिकरणाला पाठविण्यात आला आहे.

दोन ठिकाणच्या उड्डाणपूलाचे काम सुरु

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व गावकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी अनगर व अर्जुनसोंड या दोन ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारले जात आहेत. एका वर्षात दोन्ही ठिकाणचे काम पूर्ण होईल, असे नियोजन असून दोन्ही ठिकाणी सर्व्हिस रोड व गटारी देखील असतील.

- राकेश जावडे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सोलापूर

दररोज ४० हजार वाहनांची वर्दळ

सोलापूर-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग २०१० ते २०१४ या काळात पूर्ण झाला. त्यावेळी या महामार्गावरून दररोज ३० हजार वाहनांची (पॅसेंजर कार युनिट) वर्दळ होती. डिसेंबर २०२४ अखेर या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची दररोजची संख्या ४० हजारांवर पोचली आहे. वाहनांची वर्दळ वाढली व वेगही वाढला. त्यातून अपघाताचे प्रमाण वाढले असून सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक अपघातप्रवण ठिकाणे याच महामार्गावर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अपघात रोखले जावेत यासाठी नवीन उड्डाणपूल बांधले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT