सोलापूर ः उजनी धरणामध्ये ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातून पाणी येत आहे, त्याचप्रमाणात धरणातून भीमा नदी, कालवा, बोगद्याच्या माध्यमातून पाणी सोडले जात आहे. आज दुपारी तीन वाजता धरणातून भीमा नदीमध्ये 31 हजार 600 क्सुसेकने पाणी सोडले जात आहे. पाण्याचा धरणात येणारा प्रवाह पाहून नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यात बदल केला जात असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी "सकाळ'ला सांगितले.
उजनी धरणाला जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. धरण भरल्यानंतर शेतकरी सुखावला जातो. धरणातील मागील वर्षीच्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन पाटबंघारे विभागाच्यावतीने केले होते. तशाचप्रमाणे यंदाच्या वर्षीही नियोजन करण्याची तयारी विभागाने केली आहे. ऑगस्ट महिन्यातच धरण भरल्याने आता पाणी भीमा नदीमध्ये सोडल्याशिवाय पर्यायच उरत नाही. सकाळी सहा वाजता कमी असलेला भीमा नदीतील प्रवाह दुपारी तीन वाजता पुन्हा वाढविण्यात आला आहे.
उजनी धरणावर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. धरणातून बोगद्याच्या माध्यमातून या उपसा सिंचन योजनांनाही पाणी दिले जाते. आता धरणातून बोगद्यात पाणी सोडले जात असल्याने उपसा सिंचन योजनाही कार्यान्वीत झाल्या आहेत. ज्या भागात पाऊस नाही त्या भागात या योजनांच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाच्यावतीने सुरु आहे. धरणात दुपारी तीन वाजता दौंड येथून 11 हजार 645 तर बंडगार्डन येथून सात हजार 207 क्सुसेकने पाणी येत आहे. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.