महाराष्ट्र बातम्या

"उजनी'तून सोडले भीमा नदीमध्ये 31 हजार 600 क्‍सुसेकने पाणी 

संतोष सिरसट

सोलापूर ः उजनी धरणामध्ये ज्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातून पाणी येत आहे, त्याचप्रमाणात धरणातून भीमा नदी, कालवा, बोगद्याच्या माध्यमातून पाणी सोडले जात आहे. आज दुपारी तीन वाजता धरणातून भीमा नदीमध्ये 31 हजार 600 क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. पाण्याचा धरणात येणारा प्रवाह पाहून नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यात बदल केला जात असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

उजनी धरणाला जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. धरण भरल्यानंतर शेतकरी सुखावला जातो. धरणातील मागील वर्षीच्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन पाटबंघारे विभागाच्यावतीने केले होते. तशाचप्रमाणे यंदाच्या वर्षीही नियोजन करण्याची तयारी विभागाने केली आहे. ऑगस्ट महिन्यातच धरण भरल्याने आता पाणी भीमा नदीमध्ये सोडल्याशिवाय पर्यायच उरत नाही. सकाळी सहा वाजता कमी असलेला भीमा नदीतील प्रवाह दुपारी तीन वाजता पुन्हा वाढविण्यात आला आहे. 

उजनी धरणावर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. धरणातून बोगद्याच्या माध्यमातून या उपसा सिंचन योजनांनाही पाणी दिले जाते. आता धरणातून बोगद्यात पाणी सोडले जात असल्याने उपसा सिंचन योजनाही कार्यान्वीत झाल्या आहेत. ज्या भागात पाऊस नाही त्या भागात या योजनांच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाच्यावतीने सुरु आहे. धरणात दुपारी तीन वाजता दौंड येथून 11 हजार 645 तर बंडगार्डन येथून सात हजार 207 क्‍सुसेकने पाणी येत आहे. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT