Stamp-registration 
महाराष्ट्र बातम्या

राज्याच्या तिजोरीत ६ दिवसांत ६७८ कोटी

सकाळवृत्तसेवा

महिन्यात अडीच लाख दस्त; मुद्रांक शुल्क सवलतीचा परिणाम
पुणे - मुद्रांक शुल्क सवलतीचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फायदा घेतल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यात तब्बल २ लाख ४० हजार ३३३ खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. त्यापैकी महिन्याच्या शेवटच्या सहा दिवसांत झालेल्या विक्रमी दस्तनोंदणीतून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ६७८ कोटी ४३ लाख रुपयांची भर पडली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना आणि आर्थिक मंदी यामुळे बांधकाम व्यवसायात मरगळ आली होती. त्याला चालना देण्यासाठी राज्य सरकारने डिसेंबर अखेरपर्यंत तीन टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सप्टेंबरपासून राज्यात सुरू झाली. विशेष म्हणजे २४ सप्टेंबरपर्यंत राज्यात १ लाख ५६ हजार ८६६ दस्त नोंदणी झाली होती. त्यातून सरकारला ८३६ कोटी ३१ लाख रूपये महसूल मिळाला होता. त्यांनतर सहा दिवसांत म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत एकूण दस्तांची संख्या २ लाख ४० हजार ३३३ वर गेली. या सहा दिवसांत तब्बल ८३ हजार ४६७ दस्तांची नोंद झाली. त्यातून ६७८ कोटी ४३ लाख रूपयांचा महसूल सरकारला मिळाला.

इतर वेळी दर दिवशी राज्यात ८ ते ९ हजार दस्तांची नोंदणी होते. मात्र या सहा दिवसांत दर दिवशी राज्यात १३ हजार ९१२ दस्तांची नोंद झाली असल्याचे यावरून समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात तब्बल ४९ हजार ४९२, तर २०१८ च्या तुलनेत २२ हजार १८२ ने दस्त नोंदणीच्या संख्येत वाढ झाली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आज काँग्रेस करणार महात्मा गांधीच्या पुतळ्याचे रक्षण

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT