sakal exclusive
sakal exclusive sakal
महाराष्ट्र

मोठी बातमी! पाणी चोरी रोखण्यासाठी 8 जणांचे विशेष पथक; विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; कलबुर्गी जिल्हाधिकाऱ्यांनी मागितले उजनीतील 5 TMC पाणी, पण...

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण सध्या उणे ३७. ५९ टक्क्यांवर असून धरणातील मृतसाठा झपाट्याने संपत आहे. दुसरीकडे भीमा नदीवरील बंधारे, मध्यम प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे पाणी उपसा सुरु आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील पाणी टंचाई भीषण होवू शकते म्हणून पाणी चोरीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठ जणांचे स्वतंत्र पथक नेमले आहे. त्यात महसूल, महावितरण, पोलिस व महापालिकेचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आहेत.

शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात २५ मार्च रोजी उजनी धरणातून पाणी आले होते. अवघ्या १२ दिवसांत बंधाऱ्याची पाणीपातळी एक ते सव्वामीटरने खाली गेली आहे. उन्हाची तीव्रता व बाष्पीभवन, कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून पाणी उपसा, बंधाऱ्याची गळती, अशी त्याची कारणे आहे. त्यामुळे आता १० मे दरम्यान पुन्हा उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीद्वारे पाणी सोडावे लागणार आहे. त्यानंतर मात्र, सोलापूर शहराचा पाणीपुरवठा आणखी काही दिवस लांबू शकतो, असा अंदाज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे आता जिल्हा व महापालिका प्रशासनाचे संपूर्ण लक्ष उजनी धरण व औज बंधाऱ्यावर आहे.

विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाचे पत्र

कर्नाटकचे शेतकरी औज बंधाऱ्यातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करतात. त्यामुळे उजनीतून सोलापूर शहरासाठी सोडलेले बंधाऱ्यातील पाणी काही दिवसांतच संपत आहे. त्यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून होणारा पाण्याचा उपसा थांबवावा, अशी विनंती सोलापूर महापालिकेने विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच महसूल विभागानेही बंधाऱ्याजवळील वीजपुरवठा काही तास कमी करावा, असे पत्र पाठविले आहे. त्यानुसार विजयपूर जिल्हाधिकाऱ्यांनी बंधारा परिसरातील वीजपुरवठा सहा तास केला आहे.

कलबुर्गी जिल्हाधिकाऱ्यांनी मागितले उजनीतून पाणी

उजनी धरणातील मृतसाठा आता ४३.५० टीएमसीवर आला असून धरणावरील पाणीपुरवठ्याच्या योजना, जलाशयातून शेतकऱ्यांचा पाणी उपसा, बाष्पीभवनामुळे आठ-दहा दिवसाला एक टीएमसी पाणी संपत आहे. धरणातील मृतसाठ्यात अंदाजे सहा टीएमसीपर्यंत गाळ आहे. १० ते १५ मे दरम्यान उजनीतून पुन्हा सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सहा-सात टीएमसी पाणी सोडावे लागेल. पाऊस लांबल्यास जूनमध्ये जिल्ह्यातील पाणी टंचाई भीषण होवू शकते. त्यामुळे कलबुर्गीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उजनीतून साधारणत: पाच टीएमसी पाणी सोडण्याची केलेली मागणी जिल्हा प्रशासनाने फेटाळली आहे.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, प्रशासनाकडून विशेष नियोजन

भीमा नदीवरील बंधाऱ्यांचा परिसर सोडून उर्वरित भीमा नदी काठावरील वीजपुरवठा सध्या सहा तास करण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी आजपासून (सोमवार) होईल. संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज घेऊन पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष पथक देखील नेमले आहे.

- अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी, महसूल, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT