Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या हे दुर्दैवी; आदित्य ठाकरेंची टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठावाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. या बैठकीतून मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ पॅकेज मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकावर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मागच्या वर्षी ओला दुष्काळ होता. यावर्षी कोरडा दुष्काळ आहे. शेतकरी हतबल झालेले आहेत. सरकारने काहीही मदत दिलेली नाही. शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी नोटिसा आल्या आहेत. मागच्या वर्षीच्या घोषणेचेही पैसे आले नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

मराठवाड्यातील बैठकीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून काहीही अपेक्षा नाही. याउलट मंत्रिपदांसाठी भांडणे सुरू आहेत. मुळात शेतकरी, महिला अत्याचार आणि उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. आजही ५० हजार कोटींच्या घोषणा होतील. मात्र घोषणा या घोषणाच राहतात, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान जनतेला फायदा काय, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांचं विमान वापरण्यावर बदल केला आहे. आता घरचे कार्यक्रम असेल तर त्यासाठीही इतर नेत्यांना विमान वापरता येणार आहे. यासाठी लागणारा पैसा जनतेचा असल्याचं आदित्य यांनी म्हटलं.

गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ होता. त्यावेळी आम्ही सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता देखील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे की, नाही असा प्रश्न पडतो. आज परिस्शिती अशी आहे की, कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहे. हे दुर्दैव आहे, असंही आदित्य यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT