Governor Controversy Esakal
महाराष्ट्र बातम्या

Governor Controversy : उदयनराजेंच्या पत्रानंतर केंद्रात खळबळ, राज्यपालांच्या राजीनाम्यावर आजच निर्णय ?

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्राची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली

सकाळ डिजिटल टीम

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्राची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली आहे. राज्यपाल यांनी केलेल्या शिवरायांच्या व्यक्तव्याबद्दल लक्ष घालण्याची विनंती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपती यांना केली होती. त्यासंबधी एक पत्रही राष्ट्रपती यांना पाठवलं होतं.

उदयनराजे भोसले यांनी पाठवलेलं पत्र केंद्रीय गृह विभागाकडे पुढील कारवाई साठी पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रपती कार्यालयाने उदयनराजे भोसले यांना त्याबद्दलची माहिती कळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल यांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्यानंतर संतापलेल्या उदयनराजे यांनी 23 नोव्हेंबरला राष्ट्रपती यांना हे पत्र लिहलं होतं. आता या पत्राची दखल घेण्यात आली आहे.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

त्यामुळे आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान आता राष्ट्रपतींनी पत्राची दखल घेतल्यामुळे उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले आहेत. तर यासंदर्भात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, राज्यपालांना पदावरून काढण्यासाठीची प्रक्रिया मला माहिती नाही परंतु पत्राची दखल घेतल्याची कॉपी आम्हाला आजच मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT