मुंबई : कोरोनाचा (coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंट (omicron variant) 25 देशांमध्ये पसरलाय. अजूनही याचा प्रसार वाढेल असा इशारा WHO ने दिला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध लागण्याआधीच त्याचा भारतात प्रसार झाला असण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांसाठी काही नियम पाळावेच लागतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
नियम सर्वांसाठी सारखे असावेत
आपल्या नियमावलीत तफावत होती. मात्र, नियम एकसारखे हवेत, त्यामुळं भारतातील कोणत्याही विमानतळावर प्रवासी आले. तर त्यांच्यासाठी नियम सर्वांसाठी सारखे असावेत यासाठी बदल करण्यात आलेले आहेत. इतर राज्यातून येताना दुसऱ्या राज्यात जाताना आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागतो तर आपल्याकडे येताना रिपोर्ट दाखवावा लागेल. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी RTPCR अनिवार्य करण्यात आली असून आता केंद्राशी चर्चा करुनच आता नवीन नियमावली येईल, असंही अजित पवार म्हणाले कोरोनाच्या तिसऱ्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतलेली बरी, असं अजित पवार म्हणाले.
शाळांच्या संदर्भात अजित पवार म्हणाले...
शाळांच्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा झाली. आमची यावर चर्चा झाली होती, त्यावेळी हा नवा विषाणू नव्हता. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा आहे. आता शिक्षणमंत्री याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलतील, त्यानंतर त्यावर निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितलं. शाळांबाबत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगवेगळे नियम आहेत. सर्वत्र सारखे नियम असावेत, यासाठी केंद्राशी चर्चा करु, असंही ते म्हणाले. नव्या विषाणूबाबत वेगवेगळी मतं आहेत. हा विषाणू वेगानं पसरतो मात्र सौम्य आहे, असं तज्ञांचं मत आहे. कधी कधी घेतलेले नियम मागे घ्यावे लागतात, असंही ते म्हणाले.
"माझ्यासारख्या राज्यातल्या नेत्यांनी त्यावर बोलायची गरज नाही"
ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. राष्ट्रीय नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्यासारख्या राज्यातल्या नेत्यांनी बोलायची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमपीएससीतील नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
टास्क फोर्ससोबत सल्लामसलत करुन निर्णय घेऊ
मुख्यमंत्र्यांनी, मुंबईच्या महापौैरांनी, देशपातळीवर नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं आहे. त्यामुळं नियम बदलण्यात आलेले आहेत. त्या त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन टास्क फोर्ससोबत सल्लामसलत करुन निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.
एसटी आंदोलनावर बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांना होणाऱ्या त्रासाचा आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी विचार करावा. आम्ही त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा केली. एसटी आंदोलनाला तुटेपर्यंत ताणू नये असं पवार म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.