ajit pawar criticise on raj thackrey at pani foundation program
ajit pawar criticise on raj thackrey at pani foundation program 
महाराष्ट्र

एखादी सभा झाल्यावर निघून जाणे सोपे असते - अजित पवार

वृत्तसंस्था

पुणे : बोलघेवड्या लोकांना फार काही करायचे नसते. त्यांना काही दाखवयाचं नसते. त्यांची एखादी सभा झाली की त्यांना निघून जायचं असतं, ते खूप सोपे असते, अशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांनी त्यांच्यावर केलेल्या टिकेला उत्तर दिले.

आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी काही थेट प्रश्न विचारले होते. 1960 ते 2018 या कालावधीत झालेला सिंचनाचा निधी कुठे मुरला? तो जर मुरला नसता तर महाराष्ट्राची पाण्याची पातळी खाली गेली नसती, अशी टीका राज यांनी केली.

राज हे भाषण करून निघून गेले. त्यानंतर अजित पवार हे भाषणाला उभे राहिले. त्यांच्या जिव्हारी राज यांची टीका लागलेली होतीच. त्यांनी थेट राज यांचे नाव घेतले नाही. मात्र बोलघेवड्या लोकांना फार काही करायचं नसतं, असं टोला अजित पवार यांनी लगवाला. 

महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाविषयी बोलताना अजित पवार यांनी पीक पॅटर्न बदलण्याची गरज असल्याचे नमूद केले. उसासारखी पिके घेतली तर तर हा दुष्काळ कधीच दूर होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. वाॅटर कपच्या निमित्ताने लोक पाणीप्रश्नावर एकत्र येतात, ही फारच महत्त्वाची बाब आहे. आमीर यांच्या या कामामुळे महाराष्ट्र पाणीदार होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT