Ajit Pawar NCP esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP : महाराष्ट्रच नव्हे तर देशात गाजलेला पहिला बंड शरद पवारांचा

राज्य अन् देशाच्या राजकारणात बंडखोरी नवी नाही.

धनश्री भावसार-बगाडे

Rebellion in state and country politics : राजकारणात महत्वाकांक्षा, हितसंबंध आणि श्रेष्ठत्व या गोष्टींना महत्व असतं. त्यामुळे राज्यातले किंवा देशातले राजकारण अनेकदा अनपेक्षीत वाटवे असे वळण घेते. एकाचे दोन पक्ष होतात, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेते मंडळी पक्षांतर करतात. सत्तेतील पक्षाला पाडले जाते, तर काहींचे घरवापसीचे ही प्रयोग केले गेले. हे बंडखोरीचे सत्र राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नवे नाही.

देशात आणि राज्यात सर्वात पहिली गाजलेली बंडखोरी ही राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची होती. जाणून घेऊया.

आपल्याच नेत्या विरुद्ध, पक्षा विरुद्ध बंड करून पारंपरिक विरोधकांशी हातमिळवणी करून सत्तेवर येणाऱ्या राजकीय नेत्यांची देशात भलीमोठी यादीच पहायला मिळते. पवारांच्या आधी महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणीबाणीनंतर इंदिरा गांधीविरुद्ध बंड करून बाहेर पडले होते. त्यापैकी काहींनी स्वतःचा पक्षही काढला होता. त्यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदी ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता.

आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यावर तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांच्यासोबत महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस पक्ष काढला. नंतर इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्यावर शरद पवार वगळता बाकी नेते मंडळी काँग्रेसमध्ये पुन्हा दाखल झाले. हे चित्र फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर बघायला मिळत होतं.

राजकीय बंडाचा इतिहास पाहिला तर सत्तेत प्रथम क्रमांकाची जागा मिळवण्याची महत्वाकांक्षा असणारे, दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्यक्तींकडून किंवा आपल्याला सत्तेतून डावलले जात असल्याची भावना असलेल्या व्यक्तींकडून अशी बंडखोरी होत असल्याचं दिसतं. बऱ्याचदा हे नेत्यांच्या सर्वाधिक जवळ असलेल्या आणि विश्वासू व्यक्तींकडूनच होत असलेले दिसते. यात पंतप्रधान मोरारजी देसाईंची जागा घेणारे चौधरी चणसिंग, पंतप्रधान राजीव गांधींचे जवळचे नेते विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर अशी देशपातळीवरील नावं घेता येतील.

राज्यात लहान मोठे बंड करणारे, नवे पक्ष, विचार मंच काढणाऱ्याची संख्या भरपूर आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी पक्षांतर्गत एक मंच काढला होता. गोविंदराव आदिक यांनीही असाच प्रयत्न केला होता. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदाद पाटील हे कायम राजकीय युद्धाच्या किंवा बंडखोरीच्या पवित्र्यात असतं. आणीबाणीनंतरच्या काँग्रेस पराभवानंतर वसंतदादा यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा अर्स काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांच्या युतीचे सरकार चालवले आणि त्यानंतर शरद पवार यांनी केले.

शरद पवार यांची बंडखोरी

महाराष्ट्रातला सबंध देशात गाजलेला पहिला बंड हा शरद पवारांचा होता. त्यांनी १९७८ मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना सत्तेतून घालवून जनता पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांच्या मदतीने सत्ता हस्तगत केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT