Sambhaji Raje Bhosle  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Raje: "अजित पवार मुख्यमंत्री होऊच शकत नाहीत, चॅलेंज देऊन सांगतो"; संभाजीराजेंचा दावा

मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं आयोजित स्वराज्य संघटनेच्या प्रथम वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या ज्या चर्चांना ऊत आला आहे, त्यावर विधान स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं आयोजित स्वराज्य संघटनेच्या प्रथम वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य करताना अजित पवारांवर त्यांनी सडकून टीकाही केली. (Ajit Pawar will not be CM Sambhaji Raje claims Maharashtra Politics Eknath Shinde Devendra Fadnavis)

राज्यघटना पाहिजे तशी ट्विस्ट करताहेत

"राज्यघटना पाहिजे तशी ट्विस्ट करायची, हा काय प्रकार सुरु आहे महाराष्ट्रात. आता लोक म्हणतात की, मुख्यमंत्री जाणार! म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार. पण माझं चॅलेंज आहे की होऊच शकत नाहीत" असं वातावरण जाणीवपूर्वक तयार केलं जातं. हे होऊच शकत नाही कारण यांचं ठरलेलं आहे सगळं, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी सडकून टीका केली.

लोकसभेसाठी जुळवाजुळव

"देवेंद्र फडणवीस आधी राष्ट्रवादीसोबत युती कदापी नाही, कदापी नाही, कदापी नाही असं सांगत होते. तसेच अजित पवारांना तुरुंगात पाठवण्याची भाषा करत होते. पण त्यांनाच यांनी आता सोबत घेतलं आहे. गरज नसताना तुम्ही त्यांना बरोबर घेतलं आहे, लोकसभेसाठी तुम्ही हे केलं आहे का? असा सवालही संभाजीराजेंनी केला.

राष्ट्रवादीचे सर्वजण परत एकत्र आले तर

आता तर प्रश्न आहे की हे तिघे एकत्र लढणार कसे? हा एक डोकेदुखीचाच प्रश्न आहे त्यांच्यासाठी. आपल्यासाठी हे फायद्याचं आहे. पण माझा प्रश्न आहे की काय गरज होती अशी युती करायची. एकाच मतदारसंघात तिघांनाही उभं करुन टाका. मला तर असंही वाटतंय की, हे ९ मंत्री आणि हे राष्ट्रवादीवाले मोठ्या साहेबांकडं जाणार. पण हे सर्वजण परत एकत्र आले तर काय? याचं उत्तर राष्ट्रवादीचे नेते देऊ शकतील का?, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

शिवस्मारकाचं काय झालं?

दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांनी भाजपला आपल्या जुन्या वचनांची आठवण करुन देताना मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाचं काय झालं? पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करुन नऊ वर्षे झाली तरीही हे काम अजून सुरु का होत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT