Uddhav Thackeray and PM Modi
Uddhav Thackeray and PM Modi Google
महाराष्ट्र

PM मोदींच्या सुरक्षेबाबत उद्धव ठाकरे म्हणतात, 'याआधीच दोन पंतप्रधान...'

विनायक होगाडे

चंडीगड : पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेला खिंडार पडल्याच्या घटनेचे आज राजकीय वर्तुळात दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर गंभीर चिंता व्यक्त केली. दुसरीकडे आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आत याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केलंय की, पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये.पंजाब दौऱ्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उच्चस्तरिय समितीची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेसंबंधीच्या त्रुटींची सखोल चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती सुरक्षाविषयक त्रुटी शोधून काढण्याचे काम करेल, या समितीला येत्या तीन दिवसांमध्ये राज्य सरकारला अहवाल सादर करणे बंधनकारक असेल. या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मेहताबसिंग गिल, मुख्य सचिव, गृहसचिव आणि न्या. अनुराग वर्मा यांचा समावेश आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) कायद्यान्वये जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी चालविली असून केंद्रीय पातळीवरून देखील वेगळ्या चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात.

फिरोझपूरजवळ शेतकरी आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा येथील उड्डाणपुलावर अडकून पडला होता. या आंदोलनामुळे मोदींना फिरोझपूर येथील जाहीर सभा देखील रद्द करावी लागली होती. भाजपने या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पंजाब सरकारकडून अहवाल मागविला आहे. राज्याचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांनी मात्र पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहिली नव्हती असा दावा केला आहे. राज्य सरकारने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यातून सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यातील सुरक्षाविषयक त्रुटींचा मुद्दा आज सर्वोच्च न्यायालयामध्येही पोचला. एका स्वयंसेवी संस्थेने याबाबत याचिका सादर केली असून त्याबाबत त्यावर उद्या (ता.७) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्रदेश भाजप आक्रमक

पंजाब भाजप या मुद्यावरून आक्रमक झाला असून मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक बोलवावी आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना बडतर्फ केले जावे अशी मागणी केली आहे. प्रदेश भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेत याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. भारतीय किसान युनियन क्रांतिकारीचे अध्यक्ष सुरजीतकुमार फूल यांनी मात्र आंदोलक शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींचा रस्ता माहिती नव्हता असा दावा केला आहे.

माजी अधिकाऱ्यांचे पत्र

देशातील सोळा माजी पोलिस महासंचालक आणि 27 आयपीएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. मोदींचा ताफा रोखणाऱ्या आंदोलकांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT