राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी आता नव्या राज्यपालांची नियक्ती करण्यात आली आहे. (President Murmu accepts the resignation Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari Ramesh Bais has been appointed )
कोश्यारी यांच्या जागी रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर सर्व पक्षातील प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असतानाच राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची घाण गेली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अंबादास दानवे यासंबधी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राज्यपालांनी आधीच जायला हवं होतं. ते वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक विधान करत होते. मराठी माणसांच्या विरोधातही त्यांनी विधाने केली होती. महाराष्ट्राचा अवमान करण्यासाठीच राज्यपालांना पाठवलं होतं की काय अशी परिस्थिती होती.
तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यासंबधी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.