Amol Mitkari Sakal
महाराष्ट्र बातम्या

"राज्यपालांनी जास्त वेळ महाराष्ट्रात थांबू नये, उत्तराखंडमध्ये निघून जावं"

राज्यपालांच्या माफीनंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यपालांनी मुंबईबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर होत असलेल्या विरोधानंतर महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे. यासंदर्भात पत्रक काढून त्यांनी माफी मागितली असून मला महाराष्ट्रात सामावून घ्या असं अवाहनही केलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली असून महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करेल असं सांगितलं आहे.

(NCP Amol Mitkari On Governor Bhagatsingh Koshyari)

"काही लोकांनी राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. त्यांनी आता माफी मागितली असेल तर आम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करतो, महाराष्ट्रातील बळीराजा मोठ्या मनाचा आहे. क्षमा वीरस्य भूषणम्... त्यांनी आता महाराष्ट्रात जास्त वेळ थांबू नये, त्यांनी उत्तराखंडमध्ये परत गेलं तरी काही हरकत नाही. त्यांचं आता वानप्रस्थाश्रम सुरू झालं आहे." अशी बोचरी टीकाही मिटकरींनी यावेळी केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात बोलत असताना गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत, तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. या विधानावर अनेक स्तरातून होत असलेल्या टीकेला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर आज भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT