uddhav thackeray
uddhav thackeray 
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न येताच संभ्रम निर्माण केला जातो; ठाकरेंची टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कसबा पोटनिवडणुकीत भाजपचाला धुळ चारणारे काँग्रेस उमेदवाद रवींद्र धंगेकर यांनी आज मातोश्रीवर जावून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अधिवेशन सुरू आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. जनतेच्या हिताचे प्रश्न ऐरणीवर येऊच दिले जात नाही. ते प्रश्न समोर येताना दिसताच, त्यावेळी वेगळे वाद सुरू केले जाते. मुंबई-दिल्लीमध्ये कसा फोग येतो, तसे वाद समोर आणले जातात. त्यातून जनतेच्या जीवन-मरणाचे प्रश्न टाळले जातात.

दरम्यान अवकाळी पाऊस महाराष्ट्रात होतो. त्याला टाळू शकत नाही. पण अशा वेळेला नुकसान झालेल्यांना आधार देणं गरजेचं आहे. शेतकरी अन्नदाता आहे. राजकारण्यांनी स्वार्थी विचार तरी करावा. पंचनाम्याचे आदेश देऊन काही होत नाही. आदेश दिल्यानंतर आपली यंत्रणा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचते की नाही हे पाहायला हवं.अहवाल आले की नाही, याची खातरजमा करवून निकषाच्या पुढे जावून मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

मी पण आता अधिवेशनात जाणार आहे. धंगेकर यांचं अभिनंदन. पुढील निवडणुका एकत्र लढणार आहोत. मी विधीमंडळात जावून सभागृहात जाणार आहे. सभागृहात बोलण्याची गरज असेल तर नक्कीच बोलणार, असंही ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT