Ashish Shelar On Sanjay Raut Letter Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

'तिन्ही पक्षांनी संजय राऊतांची...', आशिष शेलारांची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडी कारवाईवरून लेटरबॉम्ब टाकला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ निर्माण झाली आहे. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत एकटे पडले असून त्यांना कोणीही विचारत नाही, असं शेलार म्हणाले. (Ashish Shelar On Sanjay Raut Letter)

सात वर्षांपासून या पक्षांनी भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या ७ वर्षांत तुमच्या मागे का नाही ईडी लागली? तुम्ही बोलले म्हणून ईडी लागली हे सत्य नाही. तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होतायत. त्यामुळे तुमच्या मागे ईडी लागली आहे. त्यामुळे ही तुमची आदळआपट सुरू आहे. संजय राऊतांनी आदळआपट करून मगाविकास आघाडी निर्माण केली. पण, आज ते एकाकी पडले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा एक नेता बोलायला तयार नाही. ते राष्ट्रवादीच्या गोदीत जाऊन बसलेत. पण, त्यांची परिस्थिती मांडायला तिथूनही कोणी नाही. संजय राऊत हे एकलकोंडे झाले आहेत. एकटे पडले आहेत. आता मला त्यांची चिंता वाटायला लागली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राऊतांची वाईट परिस्थिती करून ठेवली आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

संजय राऊतांनी निःपक्षपातीपणावरून केलेल्या वक्तव्यावर देखील शेलारांनी प्रतिक्रिया दिली. ज्या माणसाला स्वतःचा पक्ष माहिती नाही, त्यांनी असे विधान करू नये. त्यांनी पक्ष निःपक्षपातीपणाची भाषा बोलू नये. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करणे हे निःपक्षपातीपणा होता का? नितेश राणा आणि आमदार राणा यांच्यावर दाखल केलेला गुन्हा निःपक्षपातीपणा आहे का? मुंबई आणि राज्यातील पोलिसांचा वापर सरकार ज्या पद्धतीने करतात तो पक्षपातीपणा आहे, असंही शेलार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT