Ashok Chavan Joins BJP 
महाराष्ट्र बातम्या

Ashok Chavan Joins BJP : आदर्श घोटाळ्याचं काय झालं? भाजपत प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

Ashok Chavan Joins BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रोहित कणसे

Ashok Chavan Joins BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामागे आदर्श घोटाळ्याचा काही संबंध आहे का? या घोटाळ्याचं नेमकं काय झालं? असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत. यादरम्यान मी आयुष्याची नवी सुरूवात करत आहे, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्याविषयी देखील भाष्य केलं.

भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी चव्हाण म्हणाले मी ३८ वर्षांचा माझा राजकीय प्रवास मी आज बदल करत आहे. पंतप्राधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन राज्यात सकारात्मक काम करता आलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले. मी नेहमी सकारात्मक भूमिका घेऊनच काम करत आलो आहे. यापूर्वी देखील आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. जिल्हा आणि मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीसांनी नेहमीच मदत केली आहे. मी जेथे राहिलो तेथे प्रामाणिकपणे काम केलं आहे.

आगामी निवडणूकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, पक्ष सोडल्यानंतर काही सहकारी विरोधी बोलतात, व्यक्तीगत दोषारोप मी कोणावर करणार नाही असेही अशोक चव्हाण म्हणाले.

सबका साथ सबका विकास हे ब्रीद घेऊन पंतप्रधान मोदींचे देशातील विकासाचे विवीध पैलू पाहूण मी इंप्रेस झालो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणं काम करणार आहे. पक्ष जो आदेश देईल ते काम करणार आहे. मी कुठलीही मागणी केली नाही असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

आदर्श घोटाळ्याचं आता काय झालं?

विरोधकांकडून आदर्श घोटाळ्याचं काय झालं असा प्रश्न विचारला जात आहे. यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, या मुद्द्यावर हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. कायदेशीर प्रोसेस जी असेल ती पूर्ण केली जाईल. हा एक राजकीय अपघात म्हणावा लागेल मला एवढंच सांगायचं आहे. हा काही चिंतेचा विषय नाही असेही अशोक चव्हाण म्हणाले.

आदर्श घोटाळा काय होता?

महाराष्ट्र सरकारने युद्धात जीव गेलेल्या सैनिकांसाठी आणि संरक्षण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या कुलाबा येथे बांधण्यात आलेल्या या इमारतीला आदर्श हाउसिंग सोसायटी असे नाव देण्यात आले होते. ही बांधल्यानंतर आरटीआयमध्ये खुलासा झाला होता की नियम बाजूला ठेवून या इमारतीमधील फ्लॅट अधिकारी, नेत्यांना खूप कमी किंमतीत देणअयात आले आहे. हा घोटाळा २०१० साली बाहेर आला यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता.या घोटाळ्याच्या मुद्द्यावर अशोक चव्हाण यांच्यावर तेव्हाच्या विरोधकांकडून सतत टीका करण्यात आली.

२१ डिसेंबर २०१० साली मुंबई हायकोर्टात घोटाळा झाल्याचे उघड झाले, तसेच ही इमारत पर्यावरणाचे नियम मोडून बांधल्याचे समोर आल्यानंतर ती पाडण्याचे आदेश देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT