aurangabad news esakal
महाराष्ट्र बातम्या

सहलीला गेलेले औरंगाबादचे विद्यार्थी रायगडच्या समुद्रात बुडाले; चौघांना वाचवण्यात यश

सकाळ डिजिटल टीम

रायगडः औरंगाबाद जिल्ह्यातल्या शालेय विद्यार्थ्यांची सहल रायगड येथे गेली होती. सोबत शिक्षकही होते. यावेळी सहा विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची घटना घडली. त्यापैकी सुदैवाने चार विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे.

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी विद्यालयाची सहल रायगडच्या काशीद बीचवर गेली होती. ७० विद्यार्थ्यांसोबत पाच शिक्षकही होते. मुरुड जंजिरा येथील काशीद समुद्रामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

मिळालेल्या माहितीनुसार सहा विद्यार्थी खोल समुद्रात गेले होते. त्यापैकी चार विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं तर एकाचा बुडून मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

बुडालेल्या विद्यार्थ्यांवर अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मृत विद्यार्थ्याचं नाव प्रणव कदम असं सांगितलं जात आहे. तर रोहन बेडवाल हा बेपत्ता असून सायली राठोड, कृष्णा पाटील, तुषार वाघ, रोहन महाजन यांची प्रकृती स्थिर आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी विद्यालयाची सहल रायगड जिल्ह्यामध्ये गेली होती. समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VVS Laxman: गौतम गंभीर नाही, आशियाई क्रीडा स्पर्धेत VVS लक्ष्मण सांभाळणार टीम इंडियाची धुरा ?; BCCIचा मोठा निर्णय

Gondia News: ‘डॉक्टरांनी बाळाची एकदाही तपासणी केली नाही’; तीन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणाचा आईचा आरोप

Philips 5G Smartphone: IP64 रेटिंगसह लाँच! 5700mAh बॅटरी अन् 64MP कॅमेरा; पाहा किंमत आणि भन्नाट फीचर्स..

Marathi News Live Updates : ईडीचे कोलकातामधील ११ ठिकाणी छापे

Bihar Jharkhand Water Dispute: बिहार-झारखंडमधील २५ वर्षांचा तंटा मिटला; सोन नदीच्या पाणीवाटपावर अखेर एकमत, अधिक फायदा कोणाला?

SCROLL FOR NEXT