Aurangabad History
Aurangabad History esakal
महाराष्ट्र

Aurangabad History : फतेहनगर ते छत्रपती संभाजीनगर कितीवेळा बदललं औरंगाबादचं नाव, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Aurangajeb Death Anniversary : औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात आलं आहे. यासोबतच उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यावर ते शक्य झालं आहे.

औरंगाबादचं नाव बदलण्याचा मागणी १९८८पासून करण्यात येत होती. महाराष्ट्रातल्या या शहराला मुघल सम्राट औरंगजेबच नाव नको असा विरोध शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी त्यांनीच केली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की, औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललं आहे?

औरंगाबादचा इतिहास

औरंगाबाद शहर ज्या परिसरात आहे त्या परिसराचा संबंध सातवाहन काळाशी आहे. राजा विक्रमादित्याच्या काळातही या जागेचा उल्लेख आहे. सातवाहन कालखंडात खाम नदीच्या किनाऱ्यावर अनेक लहान मोठे गाव होते. त्यापैकी एका गावाला आज औरंगाबाद म्हणून ओलखलं जातं.

१४व्या शतकापर्यंत या ठिकाणी देवगिरीच्या हिंदू साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय यांचे वंशज यादवांचं राज्य होतं. तर काही जणांचं म्हणनं आहे की, १६०४ मध्ये अहमदनगरचे निजामशाह मुर्तजा द्वितीयचे मंत्री मलिक अंबरने औरंगाबाद शहर वसवलं आहे. पण हे शहर आधीच अस्तित्वात होतं, मलिक अंबरने याचं फक्त नामकरण फतेहनगर असं केलं होतं.

आजवर बदलले गेलेली नावं

  • १६२६ - मलिक अंबरचा मुलगा फतेह खानने फतेहनगर नाव दिलं.

  • १६३६ - बादशाह शाहजहाने औरंगजेबला इथं पाठवलं, त्याने या जागेला खुजिस्ता बुनियाद असं नाव दिलं.

  • १६५७ - औरंगजेबने परत नाव बदलून औरंगाबाद केलं.

  • १९८८ - औरंगजेबच्या नावाचा विरोद करून बाळासाहेब ठाकरेंनी याचं नाव संभाजीनगर केलं.

  • १९९५ - शिवसेना भाजप सरकारने दोन्ही शहरांचं नाव अधिकृत रित्या बदलण्याचा निर्णय घेतला पण प्रकरण कोर्टात गेलं.

  • १९९९ - काँग्रेसने कोर्टाला सांगितलं की, नाव बदलण्याचा प्रस्ताव ते मागे घेत आहेत.

  • २९ जून २०२२ - उद्धव ठाकरे सरकारने संभाजीनगर नावाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.

  • १६ जुलै २०२२ - छत्रपती संभाजीनगर नावावर शिंदे सरकारने मंजूरी दिली.

  • २४ फेब्रुवारी २०२३ - केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर नावावर मंजुरी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT