Bachchu Kadu sakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu: बच्चू कडूंमध्ये होती अस्वस्थता! रात्रभर नीट झोपही नाही, 'हे' गाणं गुणगुणत राहिले

मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर असल्याचं बच्चू कडू पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

मंत्रिपदावरुन अस्वस्थ असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सकाळी ११ वाजता आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून सरकारमध्ये रहायचं की नाही, हे स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार, आता त्यांचा निर्णय झाला असून आपण मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारमध्ये रहायचं की नाही याबाबतही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.(Latest Marathi News)

कडू म्हणाले, खरंतर गेले पाच वर्षे तुम्ही मला या सरकारमध्ये पाहत आहात. यासाठी मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेन. आम्हा दोन अपक्ष आमदारांना त्यांनी पाठिंब्यासाठी विनंती केली होती. त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि मला शब्द दिल्याप्रमाणं त्यांनी राज्यमंत्रीपदही दिलं.(Latest Marathi News)

तर सत्ता पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. लोकांची यामागे पाहण्याची भूमिका विचित्र आहे. याला स्थिरता यायला पाहिजे. लोक आमच्यावर आरोप आणि चारित्र्य हनन करत आहेत. यापुढं आम्ही दिव्यांगांसाठी शहीदांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत.  (Marathi Tajya Batmya)

त्यामुळं मंत्रीपदाचा दावा आम्ही सोडणार असल्याचा निर्णय घेणार होतो. पण आता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. त्यामुळं १७ जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे.(Latest Marathi News)

तर अगदी सकाळपर्यंत आक्रमक भूमिका घेणारे बच्चू कडू यांनी मंत्रीपदाच्या शर्यतीमधून माघार घेतली, यावर पत्रकाराने त्यांना प्रश्न केला असता कडू म्हणाले कि, मी रात्रभर 'इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर हो ना' हे ऐकत होतो. मनाचा विश्वास जेव्हा जातो, आणि ज्या गोष्टीने विश्वास जात असेल अशा गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे असं कडू यावेळी म्हणालेत. (Marathi Tajya Batmya)

आपण सामान्यांसाठी आहोत, त्याच्यांसाठी राहिलं पाहिजे. आपण ज्या विचाराने प्रभावित आहे, ते स्वीकारणं फार महत्त्वाचं असतं. आमच्या हातून काही चुका झाल्या असतील, तर त्या न होणं आणि पुन्हा त्या चुका न करणं याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. मला माझा वेळ माझ्या परिवाराला आणि माझ्या दिव्यांगासाठी द्यायचा आहे, त्यामुळे मी निर्णय घेणार होतो. पण, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज हा निर्णय घेऊ नकोस मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. त्यामुळं १७ जुलै रोजी आमची भेट होईल, त्यानंतर १८ जुलै रोजी मी माझा निर्णय जाहीर करणार आहे असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT