NCP Crisis 
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: "समोरचे लोक ताकद दाखवू शकले नाहीत"; सुनावणीपूर्वी प्रफुल पटेलांचा शरद पवार गटावर निशाणा

Sandip Kapde

NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याबाबत आज निवडणूक आयोगात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचा युक्तिवाद होणार आहे. आज एक गट आपली बाजू मांडणार आहे. अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली.

आज याबाबत सुनावणी होणार आहे. सुनावणीपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रफुल पटेल म्हणाले, दोन्ही गटाचे वकील आयोगात आपली बाजू मांडणार आहेत. आम्हाला खात्री आहे की जवळपास संघटनात्मक अधिक लोक आमच्यासोबत आहेत. निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसती राष्ट्रीय मान्यता काढून घेतली आहे. त्यामुळे नागालँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यात आम्हाला मान्यता प्राप्त आहे. त्या अर्थाने नागालँडमधील ७ आमदार तर महाराष्ट्रातील ५३ पैकी ४३ आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.

इतर संघटनात्मक लोक आमच्यासोबत आहेत. आम्ही लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. समोरचे लोक काही ताकद दाखवू शकले नाही. तरी हा माझा विषय नाही. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेणार, असे पटेल म्हणाले.

शरद पवार निवडणूक आयोगात हजर राहणार आहेत. यावर प्रफुल पटेल म्हणाले,  निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. ज्यांना संविधानात वेगळा निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या दर्जाचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे तिथं कोण गेलं. तो विषय महत्वाचा नाही. तथ्य आणि कायदा महत्वाचा आहे. आम्हाला विश्वास आहे की निवडणूक आयोग पक्ष आणि चिन्ह आम्हाला देईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT