Belgaun Black Day Sakal
महाराष्ट्र बातम्या

Belgaum : सीमा भागातल्या लोकांची नाराजी, महाराष्ट्र सरकारने एकटं पाडल्याची भावना

आज बेळगावमध्ये काळा दिवस पाळला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेळगावातला सीमा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये काळा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी महाराष्ट्रातून आपल्याकडे राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसंच नेत्यांनी आपल्याकडे पाठ फिरवल्याने इथल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून बेळगाव, निपाणी, बिदरसह ८६५ गावं संघर्ष करत आहेत. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, अशी मागणी इथले नागरिक करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटक दिनादिवशी काळा दिवस पाळला जातो. मात्र या दिवशी महाराष्ट्र सरकारमधून एकही मंत्री किंवा नेता इथे फिरकला नाही. त्यामुळे सीमा भागातल्या बांधवांना वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सीमा प्रश्नाविषयीचा लढा हा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. त्यामुळे त्याची जाण महाराष्ट्राने ठेवावी, अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसंच महाराष्ट्राने आपण सीमावासियांच्या पाठीशी आहोत, हे दाखवून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. १९६३ पासून १ नोव्हेंबर हा कर्नाटक स्थापनेचा दिवस दरवर्षी काळा दिवस म्हणून साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

Viral Video: दुकानात केळी पाहून छोट्या हत्तीला पडली भुरळ पण आईने तिथेच दिली चांगुलपणाची शिकवण, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

Parth Pawar : पार्थ पवार यांच्यावर १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश, तहसीलदाराचे निलंबन

AUS vs IND, 4th T20I: दुसऱ्या चेंडूवर झेल सुटला, मग अभिषेक शर्मा बरसला; पण ऍडम झाम्पाला षटकारानंतर काटा काढला

T20I World Cup 2026: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आणखी एक वर्ल्ड कप फायनल; पाच शहरांमध्ये होणार सामने...

SCROLL FOR NEXT