Dr. Bharati Pawar
Dr. Bharati Pawar  टिम ई सकाळ
महाराष्ट्र

कोरोनाचे रुग्ण वाढले, सतर्क राहा ! केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे आवाहन

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर घाबरण्याचे कारण नाही. पण सतर्क राहा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी गुरुवारी (ता.२१) केले. औरंगाबाद (Aurnagabad) येथील चिकालठाणा विमानतळावर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डॉ. पवार म्हणाल्या, की कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र, मिझोराम, उत्तर प्रदेशातील काही भाग आणि दिल्लीत पुन्हा कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संबंधित राज्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. राज्याने सुद्धा केंद्राच्या सूचनेप्रमाणे काम करावे. (Bharati Pawar Say, Corona Cases Increases, Be Alert)

रुग्ण वाढत असले तरी घाबरण्याची गरज नाही. परंतु सण-उत्सव आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी. यावेळी भाजपचे पदाधिकारी तथा देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांची उपस्थिती होती.

मंत्र्यांच्या खर्चाच्या प्रश्नावर जोडले हात

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी सरकारी खर्चाने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत लाखो रुपये खर्च केले. कोरोना काळात सामान्य माणसाला बेड, ऑक्सिजन मिळत नसताना मंत्र्यांनी मात्र जनतेचा पैसा स्वतःच्या उपचारावर खर्च केला.

यावरून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात डॉ. भारती पवार यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अक्षरशः हात जोडत यावर बोलणे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT