ST News  esakal
महाराष्ट्र बातम्या

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! बस वाटेत बंद पडल्यास ‘शिवाई’तूनही करता येणार त्याच तिकीटावर प्रवास; प्रवाशाने मागितले तर तिकीटाचे पैसेही मिळतात परत

प्रवाशाने साध्या बसचे तिकीट काढले असेल आणि ती बस वाटेत बंद पडली, तरीदेखील त्या प्रवाशांना मागून येणाऱ्या आरमदायी, विनाथांबा बसमधून देखील तेवढ्याच तिकीटात पुढे प्रवास करता येईल. परंतु, त्या मार्गावर दुसरी बस नाही किंवा अर्धा-एक तासाने येणार आहे, अशावेळी प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना तिकीटाचे पैसे परत देखील देण्याची तरतूद आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आता नव्या बसगाड्या घेत आहे. तरीपण, नऊ हजारांवर बस जुन्याच आहेत. प्रवासी बसमधून गावी जात असताना अनेकदा वाटेतच बस बंद पडतात. अशावेळी मागून येणारी बस शिवाई किंवा जास्त तिकीट दराची असेल, तरी तेवढ्याच तिकीटात प्रवाशांना त्यांच्या ठिकाणापर्यंत पोचविले जाईल, असे सोलापूरचे विभागप्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले.

सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सारख्या बसगाड्या बंद पडलेल्या पहायला मिळतात. त्याठिकाणी प्रवासी रस्त्यावरच दुसऱ्या बसची वाट पहात बसलेले दिसतात. त्याच मार्गावरून येणाऱ्या दुसऱ्या बसला थांबवून त्यातून प्रवासी पुढे पाठविले जातात. दरम्यान, प्रवाशाने साध्या बसचे तिकीट काढले असेल आणि ती बस वाटेत बंद पडली, तरीदेखील त्या प्रवाशांना मागून येणाऱ्या आरमदायी, विनाथांबा बसमधून देखील तेवढ्याच तिकीटात पुढे प्रवास करता येईल.

परंतु, त्या मार्गावर दुसरी बस नाही किंवा अर्धा-एक तासाने येणार आहे, अशावेळी प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांना तिकीटाचे पैसे परत देखील देण्याची तरतूद आहे. पण, प्रवासी ज्या स्थानकावरून बसला आणि ज्या ठिकाणी गाडी बंद पडली, तिथपर्यंतचे प्रवासभाडे कपात करुन घेतले जाते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, त्यांना वेळेत पुढचा प्रवास करता यावा म्हणून त्यांना दुसऱ्या बसमधून लगेचच पाठविले जाते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

...तर प्रवाशांना दिले जातात तिकीटाचे पैसे

प्रवासी एसटी बसमधून गावी जात असताना वाटेतच एसटी बस बंद पडल्यास त्यांना मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमधून पाठविले जाते. पण, काहीवेळा प्रवासी दुसऱ्या पर्यायी वाहनाने जाणार असल्याचे सांगून तिकीटाचे पैसे परत मागतात. अशावेळी जेवढा प्रवास झाला, तेवढी रक्कम कपात करून संबंधित प्रवाशाला तिकीटाचे बाकीचे पैसे परत दिले जातात.

- अमोल गोंजारी, विभागप्रमुख, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर

मागणी १०० गाड्यांची अन्‌ मिळाल्या १० बस

सोलापूरच्या मुख्य बस स्थानकावर दररोज प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळते. सोलापुरातून धाराशिव, पुणे, विजयपूर, हैदराबाद या जिल्ह्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागाने महामंडळाकडे १०० नव्या गाड्यांची मागणी केली आहे. पण, आतापर्यंत केवळ नवीन १० बस मिळाल्या आहेत. पुढील एक-दोन महिन्यात आणखी बस मिळतील, जेणेकरुन वाटेत बस बंद पडण्याचे प्रकार कमी होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

SCROLL FOR NEXT