mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! मदतीचा ‘जीआर’ बदलल्याने पिकांच्या नुकसानीचे फेरपंचनामे करण्याचे आदेश; अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची रक्कम २७० कोटींनी घटणार

राज्यात फेब्रुवारी ते जूनपर्यंतदोन लाख ६८ हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार बाधित जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे करून मदत व पुनर्वसन विभागाला अहवाल पाठविले. मात्र, अतिवृष्टीच्या मदतीच्या शासन निणर्यात बदल केल्याने बाधित जिल्ह्यांना बाधित पिकांचे पंचनामा अहवाल पुन्हा पाठवावे लागणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी ते जूनपर्यंतदोन लाख ६८ हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार बाधित जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे करून मदत व पुनर्वसन विभागाला अहवाल पाठविले. मात्र, अतिवृष्टीच्या मदतीच्या शासन निणर्यात बदल केल्याने बाधित जिल्ह्यांना बाधित पिकांचे पंचनामा अहवाल पुन्हा पाठवावे लागणार आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या पंचनामा अहवालात बदल करताना बाधित पिकांचे कोणते क्षेत्र कमी करायचे, असा पेच जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत आणि भरपाईची रक्कम देखील दुप्पट केली होती. त्यानुसार काही वर्षे बाधित शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी १३ हजार ६०० रूपये, बागायती जमिनीसाठी हेक्टरी २७ हजार रूपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी (फळपिके) हेक्टरी ३६ हजार रूपये मदत मिळाली. या अचानक बदलामुळे जिल्हा प्रशासन पेचात सापडले.

तरीपण, बाधित जिल्ह्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करून तीन हेक्टरच्या मर्यादेत भरपाईचे अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन विभागाला पाठविले. मात्र, बदललेल्या शासन निर्णयावर बोट ठेवत या विभागाने दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाईचे अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बाधित क्षेत्रात सुमारे एक लाख हेक्टरने घट होऊन भरपाईच्या रकमेत अंदाजे २७० कोटींची घट होणार आहे.

शेतकऱ्यांना याप्रमाणेच मिळेल भरपाई

  • जमिनीचा प्रकार हेक्टरी मदत

  • कोरवाहू ८,५००

  • बागायती १७,०००

  • बहुवार्षिक २२,५००

  • मदतीची मर्यादा २ हेक्टरपर्यंत

फेब्रुवारी ते जूनपर्यंतचे बाधित क्षेत्र

  • फेब्रुवारी ते एप्रिल

  • ३०,००० हेक्टर

  • मे महिना

  • १.५६ लाख हेक्टर

  • जून महिना

  • ८२,००० हेक्टर

  • एकूण बाधित क्षेत्र

  • २,६८,००० हेक्टर

जुन्या- नव्या दोन्ही शासन निर्णयानुसार पंचनामा अहवाल पाठविला

एप्रिल महिन्यातील बाधित क्षेत्राच्या नुकसानीचा पंचनामा अहवाल पाठविला होता, पण तो पुन्हा बदलून द्यायला सांगितला. नव्या शासन निर्णयानुसार आता तो अहवाल बदलून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. तत्पूर्वी, मे महिन्यातील बाधित क्षेत्राच्या नुकसानीचा अहवाल जुन्या व नव्या शासन निर्णयानुसार पाठविला आहे.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhad Mahotsav : इच्छुक उमेदवारांकडून यावर्षी प्रथमच गाव पातळीपासुन तालुकापातळीपर्यंत आखाड महोत्सवाचे आयोजन

Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह कसा हाताळावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Shanukripa Heartcare: हृदयविकारावर शस्त्रक्रियेविना उपचार! शनिकृपा हार्टकेअर सेंटरचा २५ वर्षांचा यशस्वी प्रवास

Junnar News : अंबोलीतील दाऱ्याघाटात पर्यटकांची झुंबड; निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी सहलींच्या संख्येत होतेय वाढ

SCROLL FOR NEXT