11th Class Admission  sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली, महाविद्यालय मिळूनही अनेक विद्यार्थी त्याठिकाणी प्रवेश घेत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना थेट चौथ्या खुल्या प्रवेश फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येईल, अशी अट सध्या आहे. पण, या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी होता यावे, यासाठी शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून सोलापूर जिल्ह्यातील केवळ तीन हजार विद्यार्थ्यांनीच गुरुवारपर्यंत (ता. ३) प्रवेश घेतले होते. राज्यभरातही केवळ साडेतीन लाखांपर्यंतच प्रवेश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पहिल्या गुणवत्ता यादीनुसार पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्या खुल्या फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साडेतीनशे कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. आता ज्या महाविद्यालयांना नोंदणी करायची आहे, त्यांनी २ ते ७ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करण्यासाठी व अर्जाचा भाग-एक भरणे, नियमित फेरी-एकमध्ये नोंदणी अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना २ ते ७ जुलैपर्यंत ती माहिती भरून अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहे. याशिवाय नियमित फेरी-दोनमधील अर्जाचा भाग-दोनमधील महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची सुविधा १० ते १३ जुलैपर्यंतच असणार आहे.

या काळात ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही किंवा ज्यांनी अर्धवट अर्ज भरला, त्यांनी सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलता देखील येणार आहे, पण ही प्रक्रिया मुदतीत पार पाडावी, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.

प्रवेशाच्या नियमात दुरुस्तीचा प्रस्ताव

अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली, महाविद्यालय मिळूनही अनेक विद्यार्थी त्याठिकाणी प्रवेश घेत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना थेट चौथ्या खुल्या प्रवेश फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येईल, अशी अट सध्या आहे. पण, या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत सहभागी होता यावे, यासाठी शासनाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. जेणेकरून, अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळेल हा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: पावसाचा कहर! वरंधा घाटात दरड कोसळली

SCROLL FOR NEXT