politics
politics esakal
महाराष्ट्र

CM ठाकरेंनी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीव घ्यायच ठरवलंय का?

सकाळ डिजिटल टीम

'सतंप्त सोयाबीन उत्पादक शेतकरी ठाकरे सरकारला सोटे मारल्याशिवाय राहणार नाही'

महाराष्ट्रात सध्या सोयाबीनच्या बॅगेचे भाव वाढले असल्याने विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवरं धरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ आणि मराठवड्यातील शेतकऱ्याच्या जीव घेण्याचे ठरवले आहे का?, असा सवाल भाजपाचे अनिल बोंडे यांनी केला आहे. महाबिजने सोयाबीनच्या बॅगेचे भाव हे 2000 रुपयांनी वाढवले असल्याने सतंप्त सोयाबीन उत्पादक शेतकरी ठाकरे सरकारला सोटे मारल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यासंदर्भात अनिल बोंडे यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा जीव घेण्याचे ठरवले आहे का? असा सवाल बोंडे यांनी केला आहे. ते म्हणतात, सोयाबीनचा हंगाम आता सुरू होत असून महाबीजने सोयाबीनचे भाव 2 हजार रुपये प्रतीबॅग वाढवले आहे. मागील वेळी 2, 250 रुपयाची 30 किलोची मिळणारी बॅग आज 4250 रुपयाला महाबीजने जाहीर केली आहे. म्हणजे तब्बल 2 हजार रुपयाने भाव वाढले आहेत. यात अवकाळी पावसारखी काही आपत्ती आली तर शेतकरी पुर्णपणे मरुन जाईल.

पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारने जसे खताचे भाव वाढल्यानंतर 1250 रुपयापर्यंतची सबसिडी दिली. त्याप्रमाणे राज्य सरकारला पावले उचलणे आवश्यक आहे. 2 हजार रुपयांची सबसिडी देणे आवश्यक आहे. कारण आता महाबीज बियाण्याचे भाव वाढवले त्यामुळे बाकीच्या कंपन्याही बियाण्यांचे भाव वाढवतील. परिणामी एका एकराला 4250 रुपयाचं सोयाबीन पेरावं लागणार आहे. मागील वेळेस सोयाबीनची ही किंमत 75 रुपये किलो होती. ती आता 145 रुपये किलोचं सोयाबीन बियाण हे महाबीजनं जाहीर केलं आहे.

ठाकरे सरकारचं डोकं ठिकाण्यावर नाही. त्यामुळे 17 लाख 95 हजार क्विंटल बियाणाची आवश्यकता असून ते 46 लाख हेक्टवर पेरल जाणार आहे. या 46 लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार उठलं आहे. मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आणि शेतकऱ्यांसाठी योग्य ती पावले उचलणार आहे. मात्र सरकारने एक लक्षात ठेवावे की, या बियाणांच्या किमतीच्या वाढीविरोधात सोयाबीन शेतकरी राज्य सरकारला सोटे मारल्याशिवया शांत बसणार नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT