Chandrakant Patil
Chandrakant Patil Sakal
महाराष्ट्र

'निसर्गाला तिघांचं सरकार मान्य नाही, आजच्या बंदचा निषेध'

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) ठेवायची गरज नाही. हे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात दोन मोठी वादळं आली. पण, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. हे तिघांचं सरकार निसर्गाला मान्य नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Maharashtra BJP president Chandrakant Patil) यांनी केली. आज महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदचा त्यांनी निषेध देखील केला.

सत्तेत असताना बंदची हाक देणं ही पहिली घटना आहे. सरकारमधील पक्षांचे कार्यकर्ते दंडुके घेऊन फिरत आहेत. दुकान बंद करण्याची धमकी देत आहेत. आतापर्यंत राज्यात दोन वादळे येऊन गेलीत. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. कर्जमाफी देखील अर्धवट आहे. कोल्हापूर, सांगली, चिपळूणला महापूर आला. पण, अजूनही येथील नागरिकांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करावा, असा सल्ला पाटलांनी यावेळी दिला.

महाविकास आघाडी सरकारने २०१९ ला ज्याप्रमाणे नुकसानभरपाई मिळाली त्याचप्रमाणे यंदा देखील द्यावी. २०१९ जीआर लागू करावा. पण, हे सरकार पंचनामे करत आहे. अतिवृष्टीमुळे पीके आणि घरे आठ-आठ दिवस पाण्याखाली होती. मग हे सरकार कोणत्या गोष्टीचे पंचनामे करतात? असा सवालही त्यांनी उपस्थित करतात.

अजित पवार हे खूप हुशार राजकारणी आहेत. ते एमपीएससीबाबत फसवी घोषणा करतात. जागा निघाल्या असं सांगतात. मात्र, त्या जागा एमपीएससीच्या बोर्डावरील आहेत, असं हळूच सांगितलं जातं. त्याचप्रमाणे अजित पवारांनी वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी घोषणा करू, असे म्हटले. शेतकऱ्यांच्या बाबतीत या सरकारला संवेदनशीलता नाही. लखीमपूरला घडलेल्या घटनेमुळे उत्तर प्रदेशात बंदची हाक नाही. पण, महाराष्ट्र बंद आहे. ऐन नवरात्रीमध्ये तुम्ही बंद केला आहे. त्यामुळे भक्त नाराज आहेत. शेतकऱ्यांना तुम्ही समाधान देऊ शकत नाही. याचे परिणाम सर्वांना दिसणार आहे. या बंदच्या भूमिकेबद्दल निषेध व्यक्त करतो, असेही पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT