Sharad-Pawar 
महाराष्ट्र बातम्या

भाजपनेच ‘राष्ट्रवादी’ला सत्तेसाठी विचारणा केली होती - शरद पवार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. याउलट भाजपनेच ‘राष्ट्रवादी’ला सत्तेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘राष्ट्रवादी’ने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून सरकार बनवू, असा प्रस्ताव भाजपनेच दिला होता, असा खुलासा शरद पवार यांनी केला. पवार म्हणाले की, शिवसेनेला बरोबर घ्यायचे नाही. तुम्ही आम्हाला स्थिर सरकार बनवायला 
साथ द्या, असे काही भाजप नेते आमच्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. 

‘ऑपरेशन कमळ’ म्हणजे सत्तेचा दुरुपयोग
भाजप नेते सुरुवातीला तीन महिन्यांत सरकार पाडायचा दावा करत होते. आता सहा महिन्यांत सरकार पाडू, असे म्हणत आहेत. भाजपचे ‘ऑपरेशन कमळ’ म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. त्याचा महाराष्ट्रात काहीच फरक पडणार नाही, असेही पवार या वेळी म्हणाले.

Edited By - Prashant patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

Paduka Darshan Sohala : संत आदर्शांचे अनुसरण हीच खरी गुरुभती; स्वामी स्वरूपानंद यांचे प्रतिपादन

UP News: “झाडे आहेत तरच आयुष्य आहे!” योगी आदित्यनाथ यांचा ग्लोबल वॉर्मिंगवर इशारा; वनसंवर्धनावर भर...

SCROLL FOR NEXT