Devendra Fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

पहिल्यांदा शपथविधी घेणारे सहा मंत्री घरी; मंत्रीमंडळात सहभागी होणारे सावध!

संजय मिस्कीन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 च्या पहिल्या मंत्रीमंडळात सुरूवातीला 9 मंत्र्यांनी शपथविधी घेतला. मात्र यापैकी सहा मंत्री मागील पाच वर्षात घरी गेले. त्यामुळे आता पहिल्यांदा मंत्रीमंडळात सहभागी अनेकांची पाचावर धारण बसल्याचे चित्र आहे. 

2014 ला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रीमंडळात 9 जणांचा शपथविधी करण्यात आला. यामधे अनुक्रमे एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

सर्वात प्रथम एकनाथ खडसे यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला त्यानंतर प्रकाश मेहतांची गच्छंती करण्यात आली. दिलीप कांबळे, विष्णू सावरा व विनोद तावडे या विद्यमान मंत्र्यांना या विधानसभेसाठी उमेदवारीच दिली नाही. तर, पंकजा मुंडे यांचा निवडणूकीत दारूण पराभव झाला.

या पहिल्याचं मंत्रीमंडळातील सहा जणांची दांडी गुल झाल्याने नव्याने शपथविधी घेणार्यांची पाचावर धारण असल्याची चर्चा रंगली आहे. पहिल्या नऊ जणांपैकी केवळ चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंठीवार व विद्या ठाकूर यांचे स्थान अबादित राहिले आहे. 

दरम्यान, यावेळी युतीची सत्ता विराजमान करण्याचा निर्णय झाला तर भाजप सोबत शिवसेनेच्या मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. फडणवीस व ठाकरे दोघेही नऊ हा अंक शुभांक असल्याचे मानतात. त्यामुळे सुरूवातीलाच दोन्ही पक्षातील मिळून अठरा मंत्री शपथविधी घेतील असा दावा केला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT