uddhav thackeray sanjay raut 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : संजय राऊत अन् उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय; नितेश राणेंची टीका

रोहित कणसे

आगामी २०२४ ची लोकसभा निवडूक जिंकण्यासाठी भाजपकडून राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून ट्रेनने लोकांना बोलावून गोध्रा किंवा पुलवामा सारखा हल्ला केला जाऊ शकतो असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी राऊतांसह उद्धव ठाकरेंवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

हे पाकिस्तानी एजंट आहेत का...

नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट आहेत का असा संशय आता वाटतोय. एकीकडे सर्व भारतीय राम मंदिराची वाट बघतायेत, सर्व राम भक्त आयोध्यामध्ये जाणार आहेत आणि एका ठिकाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दंगली भडकतील अशा प्रकारची विधान करत आहेत. हज यात्रेला जेव्हा मुस्लिम बांधव जातात तेव्हा असली कुठलीही विधान ना संजय राऊत करत ना उद्धव ठाकरे करतात. पण हिंदूंचे कोणते सण आले किंवा राम मंदिर हा हिंदूंचा आयुष्यातला कुठला क्षण आला तेव्हा त्यांना दंगली भडकवण्याची विधान करायचेत.

उद्धव ठाकरेंचा इतिहास हा दंगली भडकवण्याचाच आहे. 2004 ला मातोश्री मध्ये बैठक झाली आणि दंगली घडवा अशा आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. मातोश्रीतील त्या बैठकीबद्दल आजपर्यंत कोणी मला टोकलेलं नाही. पुण्यात दंगली भडकवण्याच्या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या निकटवर्ती यांची चौकशी झाली. नार्वेकर आणि किशोरी पेडणेकर. सांगलीत जी दंगल झाली त्याच्या मागे संजय राऊत यांचा हात होता असं धैर्यशील माने म्हणतात असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

तर पोलिसांना माहिती द्यावी...

संजय राऊत हे खासदार आहेत, उद्धव ठाकरे हे आमदार आहेत. त्यांच्याकडे जर का भारताविरुद्ध किंवा कोणताही कट रचणार आहे जर का अशी कोणतीही माहिती असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी ती माहिती पोलिसांकडे द्यायला पाहिजे. अशी माहिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पोलिसांकडे द्यावी, अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, मी सुद्धा एटीएसला पत्र लिहिणार आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची सखोल चौकशी करावी. हवं तर नार्कोटेस्ट करावी आणि या सर्व गोष्टींचे आढावा सरकारने घ्यावा.

संजय राऊत काय म्हणाले होते?

आम्हाला भीती वाटते जसं गोध्रा केलं असं म्हणातात, त्याप्रमाणे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी देशभरातून ट्रेन्स आयोध्येला बोलवून, एखाद्या ट्रेनवर पुलवामाप्रमाणे हल्ला घडवून देशात धर्मांधतेचा आगडोंब तर उसळवणार नाहीत ना? अशी भीती लोकांना वाटत आहे. हे काहीही करू शकतात. जर पुलवामा घडवलं जाऊ शकतं असं म्हणतात, गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात आहे. तर अशाच प्रकारचं कृत्य २०२४ च्या निवडणूका जिंकण्यासाठी केलं जाऊ शकतं अशी भीती देशातील प्रमुख राजकीय पक्षांना वाटत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. अशी भीती जनतेला देखील वाटत आहे. पण आम्ही अत्यंत सावध आहोत असे देखील खासदार संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard attack Jalgaon : जळगावमध्ये बिबट्याची दहशत; आमदार चंद्रकांत पाटील जखमी, तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

Asha Bhosle: संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत!

फक्त संगीतातच नाहीतर पाककलेत सुद्धा अव्वल होत्या आशा भोसले, जगभरात रेस्टॉरंट आणि...

Asha Bhosle Video: "मला हे दत्त गुरु दिसले...." ; आशा भोसलेंचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, भावस्पर्शी स्वराने मन भारावलं

Crispy Dosa Secret Reveal: कुरकुरीत डोशामागचं विज्ञान उलगडलं! ‘या’ एका टेस्टमुळे बनतो परफेक्ट डोसा

SCROLL FOR NEXT