Ramesh Kadam 
महाराष्ट्र बातम्या

Ramesh Kadam : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वच पक्षांकडून बोलावणं, पण...; रमेश कदमांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचं तुरुंगातून सुटून आल्यानंतर सोलापुरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं होतं. पहिल्यांदाच ते मोहोळ मतदारसंघात आले. त्यांना भेटण्यासाठी युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. ते मोहोळचे माजी आमदार होते. आता त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेबद्दल मोठं विधान केलं आहे.

कदम म्हणाले की, मी जेलमधून बाहेर आल्यापासून अनेक राजकीय पक्षातील नेत्यांचे मला फोन आले आणि बोलावणे आले आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला मदत करू,परंतु मी सर्वांना हेच सांगितले की मतदारसंघातील जनतेशी चर्चा करूनच निर्णय जाहीर करणार आहे. आपण पुन्हा मोहोळ विधानसभेची आमदारकीची निवडणूक लढणार असल्याचा निर्धार माजी आमदार रमेश कदम व्यक्त केला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील आठ वर्षे जेलमध्ये असणारे माजी आमदार रमेश कदम यांना उच्च न्यायालयाने मागील महिन्यात जामीन मंजूर केला आहे. यानंतर त्यांनी रॅली काढली.

दरम्यान मला उच्च न्यायालयाने कायमचा जामीन दिला आहे. त्यामुळे मी आता पुन्हा मतदारसंघात कायमस्वरूपी येणार असून, महिन्यातील पंधरा दिवस मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देणार असल्याचं कदम यांनी म्हटलं. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कदम यांनी म्हटलं की, सत्तेसाठी काहीही करणारी माणसं आपण पाहतोय. मात्र, आठ वर्षांपूर्वी आठ महिन्याच्या कामातून आपल्या भरपूर प्रेम मिळाल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT