Chandrakant Patil  Maharashtra government formation
Chandrakant Patil Maharashtra government formation 
महाराष्ट्र

राज्यपालांशी पुन्हा चर्चाच; भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. पण, तरीही सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. यावर राज्यपालांशी चर्चा केली. आता भाजपचे वरिष्ठ नेते जो काय तो निर्णय घेतली, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. 

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी पाटील म्हणाले,  'राज्याच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. पण, सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. त्यामुळे आता कायदेशीर पर्याय काय आहेत? याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे वरिष्ठ नेते जो काय तो निर्णय घेतली.'

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरच नाही
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना, सुरुवातीला राज्यपालांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर, त्यावर नकार देत पाटील यांनी राज्यपालांसोबतच्या बैठकीची हिंदीतून माहिती दिली आणि त्यानंतर ते निघून गेले. पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देण्यास नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT