Imtiyaz Jaleel Latest marathi News Imtiyaz Jaleel Latest marathi News
महाराष्ट्र बातम्या

Imtiyaz Jaleel: "राज्यातील 'या' शहरांची नावही बदला"; जलील यांनी दिले 'हे' पर्याय

नुकतेच औरंगाबाद आणि उस्मानाबद शहरांचं नामांतर करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

छ्त्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आक्रमक झाले आहेत. आता राज्यातील इतर जिल्ह्यांचीही नावं बदला अशी खोचक मागणी त्यांनी सरकारकडं केली आहे. यासाठी त्यांनी नावांचे पर्यायही सुचवले आहेत. (Change name of other cities also in Maharashtra Imtiyaz Jaleel gave options)

जलील म्हणाले, "आपलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे मुंबई या शहराचं बॉम्बे हे नाव बदलून मुंबई केलं. मुंबईतून काही विशेष अर्थ निघत नाही. जर महापुरुषांच्या नावावर शहरांची नावं ठेवायची आहेत. तर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही मुंबईचं नाव बदला"

तसेच मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची नावंही आता बदला. यासाठी मुंबईचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज नगर', नागपूरचं नाव 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर', पुण्याचं नाव महात्मा फुलेनगर तर कोल्हापूरचं नाव शाहूनगर करा अशी मागणीही जलील यांनी केली आहे.

हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

दरम्यान, केंद्र सरकारनं नुकताच राज्य शासनाचा जिल्ह्यांची नावं बदलण्याच्या प्रस्ताव मंजुरी दिली. त्यानुसार औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याचं नाव धाराशीव असं करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा या शहरांची नावं बदलण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT