Imtiyaz Jaleel Latest marathi News Imtiyaz Jaleel Latest marathi News
महाराष्ट्र बातम्या

Imtiyaz Jaleel: "राज्यातील 'या' शहरांची नावही बदला"; जलील यांनी दिले 'हे' पर्याय

नुकतेच औरंगाबाद आणि उस्मानाबद शहरांचं नामांतर करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

छ्त्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आक्रमक झाले आहेत. आता राज्यातील इतर जिल्ह्यांचीही नावं बदला अशी खोचक मागणी त्यांनी सरकारकडं केली आहे. यासाठी त्यांनी नावांचे पर्यायही सुचवले आहेत. (Change name of other cities also in Maharashtra Imtiyaz Jaleel gave options)

जलील म्हणाले, "आपलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे मुंबई या शहराचं बॉम्बे हे नाव बदलून मुंबई केलं. मुंबईतून काही विशेष अर्थ निघत नाही. जर महापुरुषांच्या नावावर शहरांची नावं ठेवायची आहेत. तर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तुम्ही मुंबईचं नाव बदला"

तसेच मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची नावंही आता बदला. यासाठी मुंबईचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज नगर', नागपूरचं नाव 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर', पुण्याचं नाव महात्मा फुलेनगर तर कोल्हापूरचं नाव शाहूनगर करा अशी मागणीही जलील यांनी केली आहे.

हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

दरम्यान, केंद्र सरकारनं नुकताच राज्य शासनाचा जिल्ह्यांची नावं बदलण्याच्या प्रस्ताव मंजुरी दिली. त्यानुसार औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याचं नाव धाराशीव असं करण्यात आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा या शहरांची नावं बदलण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT